Top Post Ad

भीम के लगते जिगर! आधे इधर और आधे उधर

 


   
 मानवी जीवनाला विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे माणुसकीचे जिने जगण्यासाठी एकूणच सर्व दालनांसमोर भक्कम अशी तटबंदी अर्थात मनु ने तिथे आमचा शिरकाव होऊ नये म्हणून केलेला तो कडेकोट बंदोबस्त होता. आमच्या नावाची मुंगी जाण्यालाही प्रवेश नाही कारण आम्ही गुलाम होतो ना! सूर्य चंद्र तारे आकाश आणि ही पृथ्वी त्यांनी सर्व बाजूंनी व्यापलेली अशा या भयानक अवस्थेत ज्यांना जगण्यासाठी अन्न नाही, ना वस्त्र,ना निवारा! वाटेल त्याने आमच्या माथ्यावर लाथ घालावी आणि आम्ही मात्र त्यांच्या चरणावर माथा टेकवावा?.कसा असेल तो दिवस? कशी असेल ती रात्र? व कसा असेल तो क्षण न क्षण अशा या निगर गट्ट काळाच्या घनघोर अंधारात जगायचे कसे आणि मरायचे तरी कसे? 

तेव्हा मानव देहातील एक महासुर्य गाव कुसा खाली उदयास येतो आणि सर्व मुर्दाड देहाच्या अस्पृश्य समूहातील मानवी तारांगणात स्वाभिमानी बाण्याचा असा प्राण फुंकतो इथून मग तेव्हा संघर्ष सुरू होतो महाडच्या चवदार तळ्याचा,काळाराम मंदिराचा,विषमतावादी समाजव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा,माणसाला माणुसकीने माणूस म्हणून जगू देण्यासाठीचे हे आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यासाठी आमच्या आदली पिढी किती संघर्षमय व कष्टकारक जीवन जगत असेल? याची वेळ असेल तर किंचित तरी कल्पना करून बघा! अशा या भयंकर विपरीत परिस्थितीत त्यांनी आमच्या आजच्या पिढीसाठी खरे आंबेडकरी अनुयायी म्हणून जो त्रास सोसला जी पीडा अनुभवली आणि तीळतीळ झिजून जी नवी समानता व स्वातंत्र्याची धम्म पहाट आमच्या हितासाठी व सुखासाठी आम्हास ती संविधानाच्या स्वरूपात बहाल केली असा तो आमच्या पूर्वजांनी आमच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही जतन करावा म्हणून आमच्या स्वाधीन केलेला दस्ताऐवज आहे. 

     हा संघर्षातुन आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी ठेवून दिलेला हा ठेवा आज संकटात असताना आम्ही काय करतोय? इथे आज कोणी अनैतिक मार्गाने मिळविल्या धनावर स्वतःला धनवान म्हणून मिरवतो तर कोणी भिकेत मिळालेल्या सत्तेमुळे स्वतःला भिकारचोट सत्ताधीश म्हणून मिरवतो तर कोणी कोणी प्रसिद्धीसाठी वाटेल त्या प्रकाशकाचे पाय चाटून स्वतःला मोठा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे या ठिकाणी मला लहानपणात गड आला पण सिंह गेला या धड्यातील एक प्रसंग आठवते तानाजी मालुसरे हा लढवय्या धारातीर्थी पडलेला असताना शूरवीर म्हनविणारे मावळे जेव्हा सिंहगडावरून जीव वाचवण्यासाठी पळापळ करतात तेव्हा शेलार मामा त्यांना उद्देशून म्हणतो अरे! तुमचा बाप इथे मरून पडला असताना तुम्ही काय असे भागुबाई सारखे पळता! चला परत फिरा! मी गडावरला दोर कापून टाकला आहे! आता गडावरून उड्या टाकून मरा अथवा शत्रूशी झुंज देण्यासाठी दोन हात करा! 

अर्थात झुंज देऊन वीरमरण मरण्यातच खरा पुरुषार्थ असतो व तोच खरा योद्धा ठरतो आणि आज तीच आठवण ताजी करण्यासाठी मी असे म्हणेल आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान धोक्यात असताना आम्ही भीम के लगते जिगर! आधे इधर और आधे उधर ! या गाण्याच्या धरतीवर अर्ध्यांचा चाललेला हा पळपुटेपणा थांबवा? नाहीतर! असा हा निळ्या पाखरांचा बेईमान थवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी होऊच शकत नाही! किंवा खरा वारसदार पण ठरू शकत नाही? तेव्हा आजच्या या परिस्थितीत मला म्हणावेसे वाटते की 2024 च्या लोकसभेत आपले लढाऊ प्रतिनिधी निवडून द्या! तरच संविधानाचे संरक्षण होईल अन्यथा मनुच्या अवलादीच्या लाथा परत खाण्यास सज्ज व्हा!  असे माझे हे आर्त उद्गार हे बेभान झालेले आमचे काही बांधव लक्षात घेतील एवढी आशा करतो आणि इथेच थांबतो

जय भीम जय भारत
जीवन बोदडे.9689268620,
भांबेरी,तालुका तेल्हारा,जिल्हा अकोला.
--------------------------------------------

नामदेव ढसाळांवर शरद पवारांनी असंख्य केसेस टाकल्या. प्रत्येक जिल्ह्यात एफ आय आर नोंदवले. एकाच दिवशी चार चार शहरात कोर्टाच्या तारखा पडत आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समधे हजर राहण्याच्या नोटीसा येत त्या वेगळ्याच. त्यांना थर्ड डिग्री टॉर्चर केलं गेलं. कसाबसा कुणीतरी एक वकील धावतपळत गाठला. त्याने एकूण रागरंग बघून आयडिया दिली. ढसाळांचे दोस्त कॉंग्रेसच्या अन्य एका नेत्याकडे गेले. त्याने जामीनावर बाहेर काढलं आणि त्याच रात्री दिल्लीला नेलं. प्रवासात समजावून सांगितलं. दुसया दिवशी त्यांची भेट इंदिरा गांधींशी करून दिली. तिथे ढसाळांना समजले कि पोलीसांना थर्ड डिग्रीत मारून टाकण्याच्या ऑर्डर्स आहेत. पवार साहेब हट्टाला पेटले होते.
इंदिराजी म्हणाल्या आमच्या बाजूने या. मी बघेन काय ते. ढसाळ म्हणतात माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी होकार दिला आणि जीव वाचला. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. टीव्हीवर सांगितली होती. त्यांच्या निधनानंतर ही मुलाखत अनेक वाहिन्यांनी दाखवली.
ॅट्रोसिटीखैरलांजीसारख्या अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढलेल्यांना सुद्धा अटका झाल्या होत्या. अशा असंख्य घटना आहेत. जंत्री देण्यात अर्थ नाही. त्यामुळे आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांचे रडगाणे काहीच वाटत नाही. माझ्याप्रमाणे या अनेकांच्या भावना असतील तर कॉंग्रेसचा सहानुभूती घेऊन निवडणुकांना सामोरे जायचा प्लान काही खरा नाही. त्यांनी वेगळा विचार केला पाहीजे.
२०१४ ला भाजपने लहान लहान गटांना भरपूर जागा दिल्या. अगदी आठवलेंना सुद्धा मंत्रीपद दिले.
कॉंग्रेस हा संपणारा पक्ष आहे. मागच्या वेळेसारखे आता होण्याची शक्यता कमी आहे. कॉंग्रेसचं जमिनीवरचं संघटन केव्हांच संपलेलं होतं. मीडीया आणि पैसा यावर प्रचार व्हायचा. आता ते ही मर्यादित आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीने आपली नेमकी ताकद ओळखावी.
आता पूर्वीप्रमाणे जागावाटपाच्या वेळी अडवणुकीची भूमिका घेणे, दलित, मुस्लिमांची मतं घ्यायची पण त्यांच्या स्वतंत्र नेतृत्वाला तुकडा फेकल्यासारख्या जागा सोडणे, त्या ही पाडणे ही धोरणे आता चालणार नाहीत. २०१९ ला च जर अक्कल आली असती तर निवडणुकीनंतर सेनेशी युती करण्याची पाळी आली नसती.
असे न तसे विरोधातच बसणार आहात तर दलितांच्या, ओबीसींच्या, मुस्लिमांच्या नेत्यांना पण तुमच्या पक्षाची मतं ट्रान्सफर होईल असे बघा. आघाडीचा धर्म आधी स्वत:ला शिकवा. मतं घ्यायची असतील तर द्यावीही लागतात. जागा हव्या असतील तर सोडाव्याही लागतील. आताही तिन्ही पक्षांच्या मिळून १०० च्या आतच जागा येतील. पक्ष आले तर ते भाजप सोबत जाणार नाहीत याची ग्यारंटी नाही.
नीट विचार करा. मन मोठं केलं तर यश आहे. नाहीतर आहेच ... कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच.
मित्र पक्षांची बदनामी, मिटींगमधे एक जागा सोडतो म्हणायचं, रिपोर्टरला सहकारी पक्ष १०० जागा मागतोय आम्ही २० देऊ केल्या म्हणून सांगायला सांगायचं. मित्र पक्ष बदनाम होऊन सुद्धा निवडून येत नाहीत तुम्ही.
भाजपच्या सोट्याने छोटे पक्ष मारायचे मग आपण आणि भाजप हाच सरळ सामना होईल या स्वप्नात रमणार्या या नेत्यांचे डोळे अजून तीन निवडणुका हारले तरी उघडणार आहेत का ? तिकडे भाजपने कॉंग्रेसला पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उभाही केला आणि दोन राज्ये झोळीत सुद्धा टाकलीत. गोवा, गुजरातेत प्रमुख विरोधी पक्षाकडे वाटचाल चालू झाली आहे. २०२४ ला कॉंग्रेस हरली तर सगळे आप मधे जातील. बघा काय बरं वाटतं ते.
- किरण चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com