Top Post Ad

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन


 सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली पण अजूनही इंग्रजांना चुकवणार्या  खालील 4 जणांच्या उड्या लोकांना माहीत नाही

1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी

2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत ( यात वसंतदादांचे दोन साथीदार शहिद झाले होते ) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत 40 फुटांवरून मारलेली उडी

3) सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या भिंतीवरून मारलेली उडी

4) आणखीन एक उडी आहे ज्याची फारशी चर्चा नाही .शिवाजीराव पाटलांनी धुळ्याच्या जेलमधील भिंतीवरुन मारलेली उडी .भिंत तीस एक फूट तरी नक्कीच होती .ते चिमठाणा येथील साडे पाच लाखाच्या दरोड्यांतले आरोपी होते त्यासाठी क्रांतीवीर नाना पाटलांनी काही माणसे पाठवली होती .पैसे पत्री सरकारलाच जाणार होते..शिवाजीराव आणि विद्याताईंची द्वितीय कन्या म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील .पण हे फक्त खांदेशातच माहीत आहे. (सौजन्य  Prakash Paranjape )

जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी सावरकरांच्या उडीचं मोठं भांडवल केलं. पण सावरकरांच्या आदेशानुसार त्यांच्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा यांची सोय करणाऱ्या, गावगुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या नाना पाटील यांच्या तुफान दलातील लोकांना पकडून देण्यासाठी कशाप्रकारे इंग्रजांना मदत केली त्याची माहिती लपवून ठेवली. खासकरून नागनाथअण्णा नायकवडी यांना इंग्रजांनी पकडल्यावर त्यांना पोलिसांनी कसा अमानुष शारीरिक त्रास दिला याची माहिती फार कमी जणांना आहे. आणि हा त्रास सावरकरांच्या कोलू ओढण्यापेक्षा भयानक होता. अनेकवेळा जेलमध्ये गेल्यावरही नाना पाटलांनी कधीच माफी मागितली नाही उलट इंग्रजांच्या तावडीतून पलायन करून हिंदू महासभेच्या खबऱ्याना चुकवत भूमिगत राहून कार्य केलं. अजूनही नाना पटलांबद्दलची आपुलकी ही पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात आहे 

-- विक्रांत पवार

-----------------

काय महाराष्ट्र या  स्वातंत्र्यवीरांना  ओळखतो काय?

  • १. स्वातंत्र्यवीर अण्णाजी, 
  • २. स्वातंत्र्यवीर भिमाजी 
  • ३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील 
  • ४. स्वातंत्र्यवीर भीमराव 
  • ५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले 
  • ६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले 
  • ७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले 
  • ८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले 
  • ९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले 
  • १०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले 
  • ११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी 
  • १२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु 
  • १३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण 
  • १४. स्वातंत्र्यवीर बारकू 
  • १५. स्वातंत्र्यवीर भीमा 
  • १६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण 
  • १७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण 
  • १८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण 
  • १९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी 
  • २०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु 
  • २१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर 
  • २२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई 
  • २३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई 
  • २४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई 
  • २५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ 
  • २६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड 
  • २७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत 
  • २८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज 
  • २९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम. 
  • ३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद 
  • ३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी 
  • ३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे 
  • ३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल 
  • ३४. स्वातंत्र्यवीर गोविंद 
  • ३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन 
  • ३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार 
  • ३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू 
  • ३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद 
  • ३९. स्वातंत्र्यवीर हरी 
  • ४०.स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर 
  • ४१. स्वातंत्र्यवीर होनाजी 
  • ४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव 
  • ४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव 
  • ४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे 
  • ४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु 
  • ४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर 
  • ४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु 
  • ४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे 
  • ४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम 
  • ५०. स्वातंत्र्यवीर राम कदम 
  • ५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम 
  • ५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर 
  • ५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर 
  • ५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर 
  • ५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी 
  • ५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर 
  • ५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार 
  • ५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी 
  • ५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी 
  • ६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक 
  • ६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले 
  • ६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर 
  • ६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने 
  • ६४. स्वातंत्र्यवीर मावजी 
  • ६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ 
  • ६६. स्वातंत्र्यवीर म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक 
  • ६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते 
  • ६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे 
  • ६९. स्वातंत्र्यवीर मोहन 
  • ७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक 
  • ७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक 
  • ७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक 
  • ७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक 
  • ७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक 
  • ७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर 
  • ७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी 
  • ७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार 
  • ७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर 
  • ७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर 
  • ८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील 
  • ८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील 
  • ८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील 
  • ८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील. 
  • ८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील 
  • ८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील 
  • ८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील 
  • ८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील 
  • ८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील. 
  • ८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील 
  • ९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप 
  • ९१. स्वातंत्र्यवीर राम परब 
  • ९२. स्वातंत्र्यवीर रामराव 
  • ९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर 
  • ९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी 
  • ९५. स्वातंत्र्यवीर साधू 
  • ९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू 
  • ९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत 
  • ९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत 
  • ९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत 
  • १००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत 
  • १०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत 
  • १०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत 
  • १०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे 
  • १०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत 
  • १०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे 
  • १०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात 
  • १०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी 
  • १०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक 
  • १०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा 
  • ११०. अलिअब्बास आफ्रिदी ..

हे सर्वजण आहेत, अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी
बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती! 

लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत. काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. यापैकी कुणीही इंग्रजांसमोर गुढघे टेकले नाही किंवा शरणागती पत्करली नाही . अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.  मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ? ज्यांनी  शिक्षा भोगली, त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली ...

आशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1