Top Post Ad

दलित पँथर्स ही भविष्याची गरज - रावसाहेब कसबे


मुंबई - माझा दलित पँथर या संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, किंवा मी, साहित्यिक प्रांतात झालेल्या, लिटील मॅगझिन च्या चळवळीत सहभाग घेतला नाही .ब्लैक पैंथर आणि दलित पँथर, यांचा, संबंध फक्त नावापुरता आहे. ब्लैक पैंथर ची सामाजिक स्थिती भौगोलिक स्थिती, धार्मिक स्थिती, वेगळी आहे तर, दलित पँथर ची सामाजिक स्थिती फारच वेगळी आहे. दोन्ही चळवळीचे आदर्श वेगवेगळ्या प्रकारचे आहे. अशा परिस्थितीत, ब्लैक पैंथर संघर्षात संपली, तर, दलित पँथर ची चळवळ सुरू आहे, कारण तिचे, आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांनी दलित पँथर निर्मितीच्या आधी रक्त विरहित क्रांती घडवून आणली होती. असे स्पष्ट विचार प्रसिद्ध साहित्यक रावसाहेब कसबे यांनी मांडले. दलित पँथर सुवर्णमहोत्सव सोहळ्याच्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते . त्यावेळी ते बोलत होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास आठवले आणि प्रमुख पाहुणे म्हणून, रावसाहेब कसबे होते. तेलंगणा येथील आंबेडकरी विचारवंत डॉ.मल्लीपल्ली लक्ष्मय्या हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. विचारमंचावर अर्जुन डांगळे; माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे; दिलीप जगताप; सुरेश सावंत; लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; लक्ष्मण गायकवाड; सुरेश बारशिंग; बबन कांबळे; गौतम सोनवणे राही भिडे आदी अनेक मान्यवर तसेच यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी जपानचे पंतप्रधान दिवंगत आबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला ९ जुलै रोजी प्रारंभ करण्यात आला असून वर्षभर सर्व राज्यात दलित पँथर चा  50 वा वर्धापनदिन सुवर्णमहोत्सव साजरा केला जाईल.यावेळी दलित पँथर मध्ये योगदान दिलेल्या दिवंगत पँथर्सच्या कुटुंबियांचा ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शिरीष पवार आणि प्रविण ढोणे आणि सहकाऱ्याचा शाहीरी एल्गार पार पडला.

दलित पँथर्स ही भविष्याची गरज आहे. आज ना उद्या जरूर दलित पँथर पुन्हा निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून आपला देश कधीही हिंदुराष्ट्र होणार नाही त्याचे दोर कधीच संविधनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कापले आहेत. डॉ माईसाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक सन्मान आणि न्याय देण्याचे काम तत्कालीन भारतीय दलित पँथरचे नेते रामदास आठवले यांनी केले. तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथर ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ नामांतर लढा यशस्वी लढला असेही डॉ रावसाहेब कसबे म्हणाले. 
कसबे पुढे म्हणाले की आज जे काही देशात घडत आहे ते मी १९७८ सालीच एका ग्रंथात लिहिले आहे.याकरीता डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची चिकित्सा करायला पाहिजे. उत्सव तर साजरे करा पण त्यांचे विचार आत्मसात करणेही आवश्यक आहे. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५२ साली दादासाहेब गायकवाड यांना शेड्युलकास्ट फेडरेशन बरखास्त करण्या विषयीचे पत्र पाठविले होते त्यातील अनेक दाखले दिले. जे कोणी आंबेडकरवादी इतर पक्षात जातात तो पक्ष त्यांना सेक्युलर गट म्हणून वेगळे बसण्याची मान्यता देतील का, असा सवाल उपस्थित करीत कॉग्रेसमध्ये सोशालिस्ट गट वेगळा होता असे त्यांनी सांगितले.
एके काळी हा देश बुद्धाचा होता तो नंतर मोगलांचा झाला आता तो आंबेडकरांचा झाला आहे. कारण त्यांनी आंबेडकरांचे तत्वज्ञान स्विकारले आहे. तेव्हा हा देश कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही. कारण संविधानातच त्याचे दोर बाबासाहेबांनी कापून टाकले आहेत.असे त्यांनी सांगितले. 
आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या कविता बाबुराव बागुल यांच्या कथा या पलीकडे दलित साहित्य गेलं नाही असे सांगताना दलित पँथर ही संघटना अमेरिकेतील ब्लॅक पँथर वर आधारित असली तरी ब्लॅक पँथरचा इतिहास त्यावेळी तरुणांना जास्त काही माहीत नव्हता. असे स्पष्ट करून नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला पँथरचा जाहिरनामा हा कम्युनिस्टांकडे झुकलेला आहे. असे कसबे म्हणाले.
दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर मासलिडर जर कोण असेल तर ते रामदास आठवले. त्यांनी पुढे चांगले कार्य केलं ते म्हणजे माईसाहेब आंबेडकर यांचा योग्य सन्मान केला. त्यांना कारण ते ज्या ठिकाणी जातात तिथे शंभर कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या भोवती असतो. अशी त्यांची स्तूती केली.


 आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करू या.  राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर आम्ही भारतीय दलित पँथर सुरू केली. घरादाराची राखरांगोळी करून आम्ही चळवळ चालविली. सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन भारतीय दलित पँथर आम्ही देशभर नेली.गावागावात दलितांना लढण्याची हिम्मत आणि विश्वास दिला असे ना.रामदास आठवले म्हणाले.
पँथरचा संस्थापक कोण या वादात अन्याय अत्याचारा विरोधात झेप घेणारा धगधगता अग्नी म्हणजे पँथर,त्याचा धाक इथल्या प्रस्थापितांना आणि राजकर्त्यांना होता.ढसाळ ढाले वादानंतर पँथर बरखास्त झाली त्यावेळी पँथर असायला पाहिजे म्हणून भारतीय दलित पँथरची सुरुवात झाली. त्यानंतर गायरान जमिनी,मंडल आयोग लागू करा, नेल्सन मंडेलांची सुटका करा, अशा अनेक प्रश्ना बरोबरच नामांतरचा लढा असा १७ वर्ष भारतीय दलित पँथरने संघर्ष केला.सर्वहारा समाजा करीता चळवळ उभारली.अंधार असेल तिथे मशाल घेऊन उभे राहिले पाहिजे म्हणून पँथर असली पाहिजे. याकरिता पुनरूच्चार करु असे आठवले यांनी सांगितले.
 
दलित पँथर कोणी स्थापन केली या वादात न पडता दलित पँथर्स ही जागतिक स्तरावर नोंद घेतलेली क्रांतिकारी संघटना होती. आजही दलित पँथर्सचे नाव घेतले तरी तरुणांचे क्रांतीसाठी रक्त सळसळते ;अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते असे मत तेलंगणा येथून अलेले विचारवंत उद्घाटक डॉ मल्लेपल्ली लक्षमय्या यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत हंडोरे यांनी समाजमन आणि कार्यकर्ते्यांच्या मनातलं भाषण केलं. स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षात जातीय अन्याय अत्याचार यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोणी वाली नसल्यासारखी परीस्थिती त्यात जुन्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट पडलेले.जो तो आपल्या गटात मश्गूल अशा वेळी गटातटाला वैतागलेल्या तरुणांनी पँथर स्थापन केली. पुढे पँथरचेही तुकडे झाले. आता मी एका पक्षात तुम्ही दुसऱ्या पक्षात आणखी कोण कुठल्या पक्षात अशा अवस्थेत पँथर कशी पुन्हा उभी राहणार असा सवाल करून हंडोरे म्हणाले की,आपण आज आरक्षण,शिक्षण,नोकरी पदोन्नती आरक्षण सगळ्या ठिकाणी पराभूत झालो आहे. अॅक्टोसिटीच्या किती प्रकरणी न्याय मिळाला. अक्टोसिटीच्या केसेस दाखल केल्या की तुमच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल होतात. आज समाजाची मान कापली जात असताना आम्ही मात्र आमच्या तालात आहोत. तेव्हा आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी सर्व हेवेदावे अहंकार बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आपण ज्या बाजूला असतो तिथे सत्ता येते तेव्हा समाजाच्या भल्यासाठी एकत्र या,प्रकाश आंबेडकर जर कॉग्रेस सोबत आले असते तर ४/५ खासदार १०/१५ आमदार निवडून आले असते.असे ते म्हणाले. आठवले सर्वांचे ऐकतात पण मनाचे करतात असा टोलाही त्यांनी आठवलेंना लगावत. समाज आतातरी एक करा असे आवाहन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com