Top Post Ad

सम्राट अशोकाने बांधलेली विहारं कुठं आहेत..?


सम्राट अशोककालिन जीर्ण झालेल्या बौद्धस्तूप आणि शिल्यान्यास पुनर्जीवित करण्यासाठी समिती स्थापन करा या मागणीचे निवेदन गगन मलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले याप्रासंगी आमदार संतोष बांगर, आ. संजय सिरसाट, सिद्धार्थ हत्तिअंबिरे, भीमाराव सावतकर, नितीन गजभिये आदि उपस्थित होते 


आयोध्येच्या राम मंदीराने भाजपला सत्तेवर आणून बसवले आता काशीविश्वेश्वर ही सत्ता कायम भाजपच्या हातात ठेवण्यास कारणीभूत ठरणार. कारण लवकरच २०२४च्या निवडणुका येत आहेत. तोपर्यंत हा प्रश्न असाच अधून मधून कायम चर्चेत राहिल. सन 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाराणसीच्या पाच महिलांनी वाराणसीच्या न्यायालयात दररोज दर्शन आणि पूजा करण्याच्या मागणीसाठी दावा दाखल केला होता. जो न्यायालयाने मान्य करत, परिस्थिती जाणून घेण्यासाठी वकिलांचा एक आयोग नेमण्याचा आदेश दिला होता.  16व्या शतकात औरंगजेबाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद बांधण्यात आली. न्यायालयाने एक आयोग स्थापन करून मशिदीच्या आवारात देवतांच्या मूर्तींची उपस्थिती सुनिश्चित करावी, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली. 

 तर मुस्लिम पक्षकारांनी   शृंगार ही गौरीची मूर्ती आहे असे आमचे मत आहे, परंतु ती मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीच्या बाहेर आहे. अशा स्थितीत मशिदीत जाऊन सर्वेक्षण करण्याची गरज नाही. शृंगार गौरी मंदिर असलेल्या भूखंड क्रमांक-९१३० च्या स्थितीबाबत याचिकाकर्त्यांनी कोणताही नकाशा न्यायालयात सादर केलेला नाही, असेही मस्जिदच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. धर्म दिन-ए-इलाही - 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग तोडून ज्ञानवापी मशीद बांधली असे मानले जाते. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की 14 व्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानने मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती.  तर काहींच्या मते, विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद अकबराने 1585 मध्ये नवीन धर्म दिन-ए-इलाही अंतर्गत बांधली होती. या ठिकाणी 10 फूट खोल विहीर आहे, तिला ज्ञानवापी म्हणतात. या विहिरीवरून मशिदीचे नाव ज्ञानवापी पडले. असा काहीसा अस्पष्ट इतिहास सांगण्यात येतो. मात्र या ठिकाणी हिन्दुंची देवायल असण्याआधी काय होते हे मात्र जाणिवपूर्वक सांगण्यात येत नाही जे आज गुजरातच्या सोमनाथ मंदीराच्या खाली सापडत आहे. 



देशातील मस्जिदच काय पण मंदिरे देखील बौद्ध समाजाची चैत्यगृहे होती, विहारं होती, हे आता अनेक इतिहासराकांनी वारंवार सिद्ध केले आहे. अगदी राम मंदीर ज्या ठिकाणी बांधण्यात येत होते त्या ठिकाणीही बुद्धमूर्तींचे अवषेश सापडले. मात्र भारतातील बौद्ध समाज हिन्दु मानसिकतेत असल्यानेच ज्या प्रमाणे ज्ञानवापी बाबत हिन्दू आक्रमकता दाखवताहेत तशी दाखवण्यात आली नाही. इतकेच काय तर मागील कित्येक वर्षापासून बोधगया येथील महाविहार देखील अद्याप बौद्धांच्या ताब्यात नाही. तरीही इथला बौद्ध कधी पेटून उठला नाही. २०१४ पासून या देशात हिन्दुत्वाची लाट जोरदारपणे वाहू लागली आहे. साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून ही लाट अधिक तीव्र करण्यासाठी इथली व्यवस्था संपूर्णपणे कार्यरत आहे. सत्ता हाती असल्यावर काय काय करता येते हे २०१४नंतर आलेल्या भाजपच्या राजवटीने दाखवून दिले आहे. ज्याप्रमाणे बौद्धधर्माला सम्राट अशोकाचा राजाश्रय होता त्यावेळी सुमारे ८४ हजार स्तूप, लेण्या, बौद्ध प्रतिकांची निर्मिती झाली. मात्र बौद्धधर्माला उतरती कळा लागली आणि या सर्व प्रतिकांवर मुस्लिम आणि हिन्दुंनी आक्रमण करून त्याला आपल्या प्रार्थनास्थळात रुपांतरीत केले. हा इतिहास आज प्रत्येक ठिकाणी पहायला मिळत आहे. 

ज्ञानव्यापी मस्जिद मध्ये कोर्टाचा आदेश घेऊन व्हिडिओग्राफी द्वारे तुम्हाला मस्जिद मध्ये शिवलिंग शोधण्याची वेळ आली आहे पण असे शेकडो शिवलिंग आहेत ज्या मध्ये पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या बुद्ध लेण्यावर अतिक्रमण करून लेण्यांची नासधूस करून स्तूपाला शिवलिंग करण्यात आली आहेत. जुन्नर लेण्यात गणपती असेल लोणावळ्याला एकवीरा देवी असेल,शिवेनरी किल्ल्याखालील बुद्ध लेण्यांना तुळजा लेणी व असे अनेक देव आहेत जे बुद्ध लेण्यांमध्ये असलेल्या मुर्त्यांना तोडमोड करून निर्माण करण्यात आले आहेत. पुरातत्व विभागतील व ज्याला शिलालेख वाचता येतात अश्या लोकांना घेऊन या लेण्यांमध्ये सर्वेक्षण केले तर लगेच कळेल त्या बुद्धांच्या लेण्या आहेत की हिंदूंची तथाकथित मंदिरे ? एकीकडे बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार म्हणून हिनवायचे आणि लेण्यांच्या रुपाने संपूर्ण भारतात असलेला बुद्धरुपी ऐतिहासिक वारसा नष्ट करायचा हे कार्य मागील कित्येक वर्षापासून अव्याहत सुरू आहे. अगदी अलिकडच्या काळापर्यंत देखील हे सुरूच आहे. याबाबत आता बौद्ध समाजात जागरुकता आली असून त्याची सुरुवात कार्ला लेण्यांवर बुद्धपौर्णिमेला झालेल्या कार्यक्रमाने झाली. त्याचबरोबर माननिय बाळासाहेब आंबेडकरांनीही आता सम्राट अशोकाने बांधलेली विहारं कुठं आहेत असा थेट प्रश्न विचारला आहे.




तरीही इथले सरकार जाणिवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिसकी लाठी उसीकी भैंस या उक्तीप्रमाणे सध्याचे राजकारण सुरु आहे. ज्ञानवापी मशीदबाबत मुस्लीम पक्ष ज्या 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यावर अडून बसला आहे, त्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 नंतर प्रार्थनास्थळाचे “स्टेटस आणि कॅरॅक्टर” बदलण्यात येणार नाही, अशी तरतूद आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मशिदच्या कोर्टातील वादाला या कायद्यातील कक्षेतून वगळण्यात आले होते. परंतु हा कायदा काशीसह इतर सर्व उपासना स्थळांना लागू होतो आणि ते आजही लागू आहे. यातून काय सिद्ध होते तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या हातात सत्ता असल्याने हम करे सो... जेणेकरून मंदिराच्या माध्यमातून वर्षानुवर्षे इथल्या बहुजनांना गुलामीत ठेवण्याची यंत्रणा आपल्या हातात ठेवणे, सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवणे, हाच इथल्या मंदिर संस्कृती असलेल्या प्रस्थापित व्यवस्थेचा एककलमी कार्यक्रम आहे.  राम मंदीराचा मुद्दा सुटताच मंदीराची संपूर्ण व्यवस्था बामणी वर्चस्व असलेल्या ट्रस्टीच्या ताब्यात गेली. बहुजनांना यात कोणतेही स्थान देण्यात आले नाही. याचाच अर्थ मंदीराच्या माध्यमातूनच या व्यवस्थेने मागील हजारो वर्षापासून इथल्या बहुजनांना गुलाम ठेवले आहे. आणि ते सत्तेची फळे चाखत आहेत. 


प्रकाश आंबेडकर आक्रमक -

सुप्रिम कोर्टालाही झापले,
सम्राट अशोकांनी बांधलोली विहारे कुठे आहेत?



सम्राट अशोकाने 🇮🇳 भारतामध्ये 84 हजार शिलालेख बौद्ध शिल्प स्तूप बांधली  त्यापैकी काही ठिकाणे -
A. १४ लेखांचा दीर्घ प्रस्तर लेख
१. गिरनार, जुनागढ, गुजरात
२. कालसी, डेहराडून, उत्तराखंड
३. धौली, भुवनेश्वर, ओडिशा
४. जौगडा, गंजम, ओडिशा
५. शहबाजगढी, युसुफझाई, पेशावर, पाकिस्तान
६. मनशेरा, हजरा, पाकिस्तान
७. सोपारा, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र
८. एर्रागुडी, करनुल, आंध्र प्रदेश

B. ७ लेखांचा दीर्घ स्तंभ लेख
१. टोपरा, पंजाब मात्र सध्या दिल्ली येथे
२. मेरठ, उत्तर प्रदेश
३. प्रयगराज, मात्र मूळचा कौशम्बी येथील, उत्तर प्रदेश
४. लौरिया अरिया, चंपारण बिहार
५. लौरिया नंदनगढ, चंपारण, बिहार
६. रामपूर्वा, चंपारण, बिहार

C. लघु प्रस्तर लेख
१. सासाराम, बिहार
२. रुपनाथ, जबलपूर, मध्य प्रदेश
३. बैरात, जयपूर, राजस्थान
४. गुज्जररा, दातीया, मध्य प्रदेश
५. ब्रह्मगिरी, मैसूरू, कर्नाटक
६. सिद्धपुर, मैसूरू, कर्नाटक
७. जतींगा रामेश्वर, मैसूरू, कर्नाटक
८. मसकी, रायचूर, कर्नाटक
९. गोविमठ, रायचूर, कर्नाटक
१०. पालकीगुंडा, मांडगिरी, कर्नाटक
११. एर्रागुडी, करनुल, आंध्र प्रदेश
१२. राजुला मंडागिरी, करनुल, आंध्र प्रदेश
१३. भाब्रू, जयपूर, राजस्थान

D. विशिष्ट प्रस्तर शिलालेख
१. कलिंगा, धौली, ओडिशा
२. जौगडा, गंजम, ओडिशा
३. कंदहार, अफगाणिस्तान
४. लघमान, अफगाणिस्तान

E. लघु स्तंभ लेख
१. सारनाथ, उत्तर प्रदेश
२. कौशम्बी, उत्तर प्रदेश
३. सांची प्रवेशद्वार, भोपाळ, मध्य प्रदेश
४. राणीचा लेख, अलाहाबाद स्तंभ, उत्तर प्रदेश

F. लघु स्तंभ शिलालेख
१. रुमानदेई, लुम्बिनी, नेपाळ
२. निगळीवा, नेपाळ 🇭🇰

G. लेणीं शिलालेख
१. बाराबार लेणीं शिलालेख

अतुल मुरलीधर भोसेकर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com