Top Post Ad

हजारो जातींची निर्मीती कुठल्या धर्मान केली ?

 ३३ कोटी देवांची निर्मीती कुठल्या धर्मान केली ? हजारो जातींची निर्मीती कुठल्या धर्मान केली ? 
बहुजनांनी शिकायचचं नाही .फक्त काबाड कष्ट करायचे .असे कुठल्या धर्मान सांगितलं?-  
अस्पृश्य ठरवून ज्यांच्या सावलीन माणूस बाटत होता, कुठल्या धर्माची निर्मीती ? 
सतीची अमानवीय चाल कोणत्या धर्माची ? 
स्त्री ने चुल आणि मुल, वाढा-उष्ट काढा, आणि पुरुषांची सर्वप्रकारची सेवा करायची. ही पध्दत कुठल्या धर्मातली ?
 कुणब्यान शेतीच करायची ,चांभारान चांबडच सोलायच, बामणान देवळात बसून आयत गिळायचं ही अन्याकारक पध्दत कुठल्या धर्मातली ? 
पुरुषाने कितीही लग्न करावी स्त्री ने मात्र एकदाच.विधवा झाली की मुंडण करून विद्रूप दुर्लक्षित आयुष्य जगायच ,हा अन्याय कुठल्या धर्मातला ? 
मुलगी झाली तर मारायची आणि पहिला मुलगा नदीला सोडायचा हा अमानुष रिवाज कुठल्या धर्मातला ?  
कितीही नालायक असला तरी तो श्रेष्ठ आणि बहुजन कितीही चांगला असला तरी तो शुद्र हा अविवेकी युक्तीवाद कुठल्या धर्माचा ? (शिवाजी महाराज "शुद्र" म्हणूनच राज्याभिषेक नाकारला )  

बहुजनाच लग्न झालं की नववधूला ब्राह्मणाकडे शुध्द करण्यासाठी पाठवायची रीत कुठल्या धर्माची ? (ब्राह्मणाने वधूला शुध्द करणे म्हणजे तिचा "शारीरीक भोग घेणे" त्यानंतर नवऱ्याचा अधिकार, बहुजनांच्या गरीब मुलींच्या अंगाचा वास येऊ नये म्हणून हळद लावण्याची प्रथा चालू झाली. "सत्यनारायण" याच "वधू शुध्दीकरणाचा" समारंभ आहे. वधू-वर सत्य नारायणाच्या पुजेला बसतात तेंव्हा ब्राह्मण नवरदेवाला बोलायला सांगतो "मम भार्या समरपयामी". म्हणजे हे ब्राह्मण देवा मी माझी पत्नी राजी खुशीन तुला शुध्द करण्यास्तव देत आहे. मग नवरदेव पळीत पाणी घेऊन ब्राह्मणाच्या हातावर सोडतो वधू हाताला हात लावते आणि दोघ "मम" म्हणतात. "मम म्हणजे आम्हाला मान्य आहे".

 माणूस जन्मल्या पासून मरे पर्यंत ब्राह्मणावर अवलंबून राहतो हे कुठल्या धर्माच फॕड ?  

प्रत्येक सुखात आणि दुःखातही ब्राह्मणाने स्वतःला बहुजनांच्या जीवनात असं एकजीव केलय की दुःखातही तो बहुजनाकडून काहीना काही घेऊ शकतो. आपण उसने दिलेले पैसे माणूस दुःखात असताना मागणार नाही. पण ब्राह्मण आपलं उदरभरणाच काम निर्दयपणे उरकतो . ब्राह्मणाने बलात्कार केला तरी त्याला शेंडी कापण्याची नाममात्र सजा आणि बहुजनान नुसत सवर्ण बाईकडे पाहिल असं खोट सांगितल तरी देहदंड ही कुठल्या धर्माची रीत ?

 मानवाच्या नुसत्या सावलीने देवच काय बाटतो भूतं सुद्धा, आणि शुध्द करायला पशुच मूत. ही कुठल्या धर्माची रीत? 

एक जात दुसऱ्या जातीशी रोटी बेटी व्यवहार आजही करीत नाही. हा नियम कुठल्या धर्माचा ? असे हजारो प्रश्न विचारता येतील. ज्यांचे उत्तर तुम्हा आम्हाला अगदी तोंडपाठ आहे. 

इंग्रज आले आणि हजारो बदल झाले. शिक्षणाची बंद दार उघडली गेली. शिक्षण बंदी हटली, जातीनिहाय व्यवसायबंदी हटली.  याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणाची धोतरं सुटली . त्यातच शिक्षणानं  "ज्योतीबा - सावित्री" सारखी माणस बहुजन मुक्तीच्या करुणेनं पेटली .तरीही. अजून या देशात ३३ कोटी देव आहेत.  जात आणि जातीयता आहे. आजूनही देव बाटतो आणि पशुच्या मुतानं शुध्द होतो. अजूनही शोषण आहे. अंधश्रध्दा आहे. वकील, डॉक्टरालाही मुलाचं नाव ठेवायला ब्राह्मण लागतो. मम भार्या समरपयामी म्हणतो. मी जर याच धर्मातला आहे तर हा धर्म माझा असून हे आजही का होतय. मी सहन का करतोय ? हा धर्म माझा नाही . किंवा मी या धर्माचा नाही ? या प्रश्नाचं उत्तर शोधलच पाहिजे. अन्यथा सुशिक्षित असून काय कामाचे नाही.   हेच सत्य .

- संकलन: अरुणा नारायण (अहमदनगर)


-----------------------------------

छत्रपती शाहूजी महाराजांनी बऱ्याच वेळा सांगूनही त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईसाहेब काही ऐकल्याच नाहीत, ही बाब त्यांनी चातुर्मासात वाड्यात पोथी पुराणांचे वाचन करण्याची परवानगी महाराजांच्या मातोश्रींकडून मिळवली. आता पोथी पुराणांचे वाचन लावायचेच असेल तर महाराजांनी *मत्स्यपुराणातील अनंगदानाचा ७० वा अध्याय* लावा असे सांगितले . यावर मनोभावे पूजा अर्चना करणाऱ्या लक्ष्मीबाईसाहेबांना खूप आनंद झाला . पोथी सुरू झाल्यावर महाराज लंडन दौऱ्यावर निघून गेले आणि पोथी संपण्याच्या सुमारासच घरी आले.  
  
मत्स्यपुराणातील ७० व्या अध्यायाचे वाचन संपत आले होते. या दिवशी तरी महाराजांनी हा अध्याय आपल्याबरोबर ऐकावा अशी विनंती लक्ष्मीबाईसाहेबांनी महाराजांना केली तेव्हा महाराज बसले.      तो नेहमीचा पुरोहित आला त्याचे मनोभावे पाद्यप्रक्षालन करण्यात आले. महाराज वगळता सगळ्यांनी त्याचे दर्शन घेतले. त्याने भक्तीमय वातावरणात ७० वा अध्याय सांगितला.    महाराजांनी त्यास मराठीत निरूपण करण्यास सांगितले असता त्याने सदर श्लोकाचा अर्थ सांगितला तो येणेप्रमाणे, 

" चातुर्मासात श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणेत्तर स्ञीला सुगंधादि पाण्याने आंघोळ घालावी. तिला नवीन कपडे परिधान करण्यास द्यावीत. तिला अंलंकारादि भूषणाने नटवावे व हे सर्व झाल्यानंतर राञी भोगण्यासाठी ब्राह्मणाकडे सुपूर्द करावे व ब्राह्मणाने त्या ब्राह्मणेत्तर महिलेला यथेच्छ भोगावे .".
      हे ऐकताच लक्ष्मीबाईसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अंगाचा तीळपापड झाला. डोळ्यात क्रोध भरला. राजस्त्रीचा मर्यादाशील स्वभाव सारून ज्याच्या पायांची थोड्या वेळापूर्वी पूजा केली होती त्या भटजींच्या अंगावर त्या आपले पायताण घेऊन धावल्या.     महाराजांनी भटजीला दूर केले व लक्ष्मीबाईसाहेबांसमोर दूध का दूध पाणी का पाणी केले. तेव्हापासून तिथे कोणतेही वैदिकोपचार झाले नाहीत. खुद्द लक्ष्मीबाईसाहेबांनी याला आळा घातला....
     राजहूकूम देऊन महाराजांना हे बंद करता आले असते वा नकार देता आला असता परंतु महाराजांनी प्रबोधनाचा दुसरा मार्ग स्विकारला.

       #_मम_भार्या_समार्पियामी* (मराठीतील अर्थ - माझी बायको तुला देऊन टाकतो ) म्हणून मिटकरींनी अर्थ सांगितला पण ब्रम्हवृंद चवताळून उठलाय आता त्यांनी हे धार्मिक थोतांड मान्य करावे !


---------------------------------

" जो तु ब्राह्मण ब्राह्मणी जाया। तवू आन बाट काहे न आया।।."   -- संत कबीर.

" झूट ना बोल पांडे". -- गुरू नानक.४." ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?"   --  शिवछत्रपती.

" करी आणिकांचा अपमान,      खळ छळवादी ब्राह्मण|| 
 तया देता दान,       नरका जाती उभयता ||"   --  संत तुकाराम.

" मेला ब्राह्मण हरामखोरीस गेला. परंतू मी बाई म्हणून पाहू नका. खांद्यावर भाला घेऊन उभी राहीन तेव्हा पेशव्यांच्या दौलतीस जड जाईल.आम्ही तुमच्यासारखी भाटभडवी करून राज्य कमावलेले नाही. आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या जोरावर हे राज्य मिळविले आहे".  -- अहिल्याबाई होळकर.

 " ब्राह्मणांचे वर्चस्व त्यांच्या ज्ञानामुळे नसून त्यांनी समाजात पसरविलेल्या आणि पसरवित असलेल्या अज्ञानामुळे आहे". -- महात्मा फुले.     

" ब्राह्मणी कावा समजूनी घ्यावा।  ब्राह्मणाचे इथे नाही प्रयोजन।   दयावे हाकलून। जोती म्हणे।।"   -- महात्मा फुले.

" इंग्रजी शिकोनी जातीभेद मोडा। भटजी भारूडा फेकोनीया।।"   -- क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले.

" मंदिरात देव नसतो तर पुजा-याचे पोट असते".  -- संत गाडगेबाबा.

" ब्राह्मणांनी पसरविलेल्या चूकीच्या कल्पनांच्या कचाट्यातून हिंदूमनाची मुक्तता झाली पाहिजे. या मुक्तीशिवाय भारताला भवितव्य  नाही."  --  डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

" ब्राह्मणी ग्रंथांनी आमची मूळची नैसर्गिक संस्कृती विकृत करून टाकली. या आत्मनिष्ठ स्वार्थी पुरोहितशाहीचा बिमोड करून त्या ठिकाणी स्वाभाविक नैसर्गिक मूल्यांची संस्थापना करणे मी माझे कर्तव्य समजतो. " -  डॉ .पंजाबराव देशमुख


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com