Top Post Ad

विषमतावादी शिक्षक दिन ५ सप्टेबर

भारत हा विषमतावादी विचारांचे पारंपरिक रीतिरिवाज साजरे करणाऱ्या जातिवादी शिक्षण देणाऱ्याचे समर्थन करणारा देश आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.कारण देशातील सर्व शिक्षण संस्था डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतात पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात. डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केल्या जातो. पण आता मानसिक गुलामगिरिच्या एक एक श्रृंखला तुटत आहेत गुलामगिरीची असंख्य प्रतिक आता लवकरच संपणार आहेत पण त्यासाठी गरज आहे वैचारिक प्रबोधनाची. देशातील बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता जोतीराव फुले आहेत हे ठामपणे मांडणारे शिक्षक आणि विद्यार्थी तयार होणार नाहीत तो पर्यन्त शासकीय पातळीवर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन साजरा होत राहील.

   राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस,तारिक चुकीची आहे.असे डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी लिहलेल्या चरित्र ग्रंथात सांगितले आहे (संदर्भ - as Radhakrishnana a Biography -Page 10,काही वर्षापूर्वी हे चरित्र गुगल वर उपलब्द आता नाही.) म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते.जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरु केली होती. १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली होती, म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केली म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते आणि आहेत. जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केली नाही. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुळेच भारतीयांना शिक्षणाची संधी मिळाली. शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले.शिक्षणा अभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे.याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या 

 यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा त्यांच्या तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता.तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या म्हणजे देशातील पाहिले शिक्षक हे राष्टपिता महात्मा जोतीराव फुलेच होते. डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केली नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ.राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही. बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास ब्राम्हण लोकांचा तिव्र विरोध होता.त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविणाऱ्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही.किंवा मुला मूली कडून कोणतीही फ्री घेतली नाही गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले.यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान दिले नाही. त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले या पाठीमागे त्यांची किती तळमळ होती हे लक्षात घ्या कारण त्यांना समाजसेवा करायची नव्हती तर समाज परिवर्तन करायचे होते.

    डॉ.राधाकृष्णन यांनी बहुजनांसाठी विनावेतन तर सोडाच पण वेतन घेऊन देखील  शिकविले नाही.याउलट भरपूर पागार घेउन फक्त उच्चभ्रू समाजाच्या मुलांना शिकविले. उच्चभ्रू समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते मद्रास, हैद्राबाद, कलकत्ता, बनारस इ. विद्यापिठात गेले.पण एकाही खेड्यात जाउन बहुजनांच्या मुला-मुलींना शिकविले नाही. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले. भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षते खाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले होते.तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर ब्राम्हण शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.गोर-गरीब, कष्टकारी, कामगार,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले.असे काम डॉ. राधाकृष्णन यांनी कधीच केले नाही.तरी शिक्षक दिनाचे हक्कदार कसे?.

   राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली. डॉ. राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केला. त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला होता. त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान नाही काय?. जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तज्ञ होते.खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई) इ. बांधकामे केली.त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर टाटा, बिर्ला, अंबानी पेक्षा तात्याराव श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या होत्या.बहुजनांना शिक्षण मिळाल्या शिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव यांनी शाळा सुरु केल्या.  डॉ.राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मिळकतिचा एक रुपया देखिल बहुजनांच्या शिक्षणांसाठी खर्च केला नाही. देशातील ज्वलंत समस्या निवारण्यासाठी जोतीरावनी सनातनी ब्राम्हण समाजा विरुद्ध निर्भयपणे लढा दिला.

  जोतीराव यांनी बालविवाह ला कडाडून विरोध केला तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांचा विचार न करता ११ ते १६ वर्षी केली त्यांच्या मुलीने नवऱ्या मुलाला साधे पाहिले देखिल नव्हते. म्हणजे संपूर्ण जगात तत्वज्ञानावर व्याख्याने देणाऱ्या अमेरिका, इंग्लड, रशिया इ. राष्ट्रात प्रदीर्घ वास्तव केलेले असताना देखिल स्वतःच्या मुलींचे त्यांनी बालपणीच विवाह केले.विवाहा बाबत ते म्हणतात की लग्न ही स्वर्गात ठरवली जातात म्हणजे ते किती सनातनी प्रतिगामी विचारांचे होते यावरून दिसून येते.या उलट जोतीराव यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठविला होता.आणि समाजात जनजागृती केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला आणि वाढविला. तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे होते ते आज ही सर्व मानव जातीच्या कल्याणा करीता वापरता येते.डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी "राधाकृष्ण अ बायोग्राफी" या ग्रंथात डॉ. राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे क्रांतिबा जोतीराव फुले कुठे आणि हे डॉ राधाकृष्ण कुठे?.

डॉ राधाकृष्ण यांचा समाज त्यावेळी झोपला होता पण आज सर्वत्र जागा आहे.ज्या स्रियांना शिकण्यासाठी बंदी होती.त्याच समाजाच्या स्रिया आज शिक्षणात पुढे आहेत.त्याच्यावर जोतीराव आणि सावित्रीबाई जे उपकार केले आहेत ते या स्रिया विसरतात.हे फुले दांपत्य जर नसते तर ब्राम्हणाच्या स्रिया कुठे असत्या ?. या स्रियांना त्याच्या समाजातील पुरुष किती किंमत देतात ?. पण जोतीराव फुले यांनी सावित्रीबाई ना कधीही स्त्री म्हणून गौण लेखले नाही.याउलट त्यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर केला त्यांच्यावर विश्वास ठेवला.जोतीराव यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व प्रकारे मदत केली जोतीराव सावित्रीमाई यांना नेहमी अहो-काहो असे आदराने बोलत असत.डॉ राधाकृष्णन यांनी मात्र त्यांच्या पत्नी शिवकम्मू यांना स्वातंत्र दिले नाही त्यांना शिकविले नाही म्हनुनच त्यांचे व्यक्तिमत्व कोमेजुन गेले.स्त्री शिक्षणासाठी एकही कार्य राधाकृष्णन यांनी केलेले नाही.जोतीराव यांनी स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र व शिक्षण तर दिलच पण देशातील सर्व जातीधर्माच्या मुलींना शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी दिले,ती प्रचंड संघर्ष करून, म्हणून त्यांच्या शाळेत शिकणारी मातंग समाजातील विद्यार्थिनी कु.मुक्ता साळवे ही धर्माबाबत अप्रतिम निबंध लिहू शकली. जोतीराव यांच्या स्त्रिस्वातंत्र्याचे हे फल आहे तर डॉ. राधाकृष्णन यांचे मात्र स्त्रियांबाबताचे विचार हे खालच्या पातळीवरचे होते.

 स्त्रियांमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता जास्त असते सेवावृत्ति हीच स्त्रियांची मूळ प्रवृत्ति आहे.असे म्हणण्या मागे मला नाही वाटत की त्यांना स्त्रियांबद्दल काही सहानभूति होती ते यामागे स्त्रियांना गुलाम ठेवणे हाच हेतु त्यांचा आहे. तरी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार की शिक्षणाचे महत्व समजावून सांगणारे व स्वखर्चाने शाळा काढून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करा. याचा सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून विचार करा व निर्यय घ्या तुम्हीच विचार करा कि खरा शिक्षक दिन कोणता राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर कि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर ?? 

सागर रामभाऊ तायडे ,
९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com