पण हॉकीपटू वंदना कटारिया बाबत नुकताच झालेला प्रकार म्हणजे जातीयतेची मानसिकता असलेल्या किड्यांनी कळसच गाठला म्हणायला हवा. वंदना कटारियाने हॉकीमध्ये शानदार कामगिरी केली तर लगेच इथले किडे तीची जात शोधायला गुगलवर धावले. तिकडे ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रचंड परिश्रम करून मेडलच्या मागे धावत होते तर इकडे हे किडे त्यांची जात शोधण्यात गर्क होते. इतकेच नव्हे तर या स्वत:ला भारतीय म्हणवून घेण्राया किड्यांनी महिलासंघ हॉकी हरला म्हणून वंदना कटारियाच्या घरासमोर फटाके वाजवले. ही कुठली देशभक्ती. देशभक्तीची व्याख्या करणारे राजकारणी किंवा विचारवतांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. किंवा या देशद्रोह्यांच्या विरोधात सोशल मिडीयाही गाजवला नाही.
1993 मध्ये धमाकेदार कारकीर्द सुरू करण्राया कांबळीने पहिल्या सात कसोटी सामन्यात 2 द्विशतके ठोकली, पण त्याची कसोटी कारकीर्द दोन वर्षातच संपली! सचिन आणि कांबळी दोघांनी मिळून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि दोघेही उत्कृष्ट खेळाडू होते, पण एक दलित खेळाडू पुढे जाताना पाहून मनुवादीचे पोट दुखू लागले, आणि त्याला कायमचे बाद केले, मात्र विश्वकप स्पर्धेत एक रान काढणारा सचिन देशासाठी 24 वर्षे खेळला, पण कांबळी काही दिवसातच गायब झाला, कारण कांबळीची कारकीर्द संपवण्यासाठी तो शिस्तबद्ध नसल्याचा आरोप जातिवादी करत राहिले! सर्वात यशस्वी फलंदाजांसोबत असा प्रकार घडला.. जर आकडेवारी पाहिली तर असे निदर्शनास येते की, जातीवादाने एका महान खेळाडूची कारकीर्द उध्वस्त केली होती. विनोद कांबळीच्या काळात सुद्धा सोशल मीडिया असता तर त्यांची कारकीर्द कदाचित टिकण्यास मदत मिळाली असती.
त्यानंतर आपल्यासमोर मोठ्ठ उदाहरण आहे ते अगदी अलिकडचं प्रणव धनवडेचं. ज्याने 15 व्या वर्षातच 327 बॉलमध्ये 1009 धावा ठोकल्या. एका अॅटो रिक्षाचालकाचा मुलगा त्यातही बहुजन वर्गातला असल्याने अन्डर-16 मध्ये त्याची निवडच झाली नाही. मात्र आपल्या वडिलाचं वलंय असलेल्या अर्जुन तेंडूलकरला सहजतेने संघात प्रवेश मिळतो. इथे तुमच्या गुणवत्तेला काडीचीही किंमत नाही तर तुमच्या जातीचाच मान-सन्मान केला जात आहे. हे जातीवादी किडे दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत आहेत. भारतातील प्रत्येक क्षेत्रात यांचा शिरकाव आहे. त्याचा परिणाम मागील अनेक काळापासून भारत देशाला भोगावा लागत आहे. भारत हे प्रतिभा आणि गुणवत्तेचे स्मशान बनले आहे. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पधेत चीनने 51 पदकं जिंकली आहेत. ज्यामध्ये 24 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. कारण तीथे गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. इथली तथाकथीत स्वत:ला उच्च समजणारी मंडळीना याबाबत काही देणे-घेणे नाही. देश हरला तरी चालेल पण जात जिंकली पाहिजे. वंदना कटारीयाच्या घरासमोर झालेल्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने सिद्ध होते.
जातीच्या संसर्गजन्य रोगानं लोकांचा मेंदू नासलाय
हजारो वर्षांपासून या देशात लोकांनी हा रोग पोसलाय.
काही विकृतांना जातीधर्मापेक्षा देश मोठा वाटतंच नाही
इथे मराठा ब्राह्मण भेटतील पण भारतीय कुणी भेटतंच नाही.
तरीही मेरा भारत महान आहे. म्हणूनच वंदना कटारिया तु आम्हाला माफ कर !
--- सुबोध शाक्यरत्न
0 टिप्पण्या