Top Post Ad

त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले

 


अण्णा भाऊ साठे
 ...  एक मराठी समाजसुधारक, लोकशाहीर लोककवी आणि सुप्रसिद्ध लेखक म्हणजे तुकाराम भाऊराव साठे (जन्म १ ऑगस्ट १९२०,मृत्यू १८ जुलै १९६९) अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. तुकाराम साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती.मधुकर,शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ साठे एका मांग दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ हे मार्क्सवादी-कम्युनिस्ट विचारांचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौध्द धम्म दिक्षा नंतर आंबेडकरवादी झाल्याचे म्हणतात. त्यांचा मातंग समाज आज ही कट्टरपंथीय हिंदू असण्याचा गर्वाने सांगतो.

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले. मुंबई,मराठवाडा,विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या लढाईत त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत.चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्वज्ञानाची विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी "लाल बावटा" या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या सोबत होते. लोकगायनातून लोकप्रबोधन करीत असताना त्यांनी त्यांच्या अनुभव लिहायला सुरुवात केली. आणि अजरामर साहित्य निर्माण झाले.लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळत गेली.असंघटीत समाजाला आपल्या शाहिरीतून जागृत करणारा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील असंघटितांचा चमकता लाल तारा होता.

मुंबईत अण्णांच्या आयुष्याला १९४५ साली कलाटणी मिळाली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली.या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना लेखन करायला खूप मेहनत करण्याची गरज पडली नाही. अण्णांभाऊचे लिखाण नेहमी कष्टकरी कामगार मजूर डोळ्या समोर ठेऊन होत होते.त्यातील नायक हा अन्याय अत्याचारा विरोध लढणार आणि जातिव्यवस्थे विरोधी बंड करून उठनाराच होता. त्याच्या प्रत्येक कथा,कांदबरया,वगनाट्य चा नायक हा सर्व सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे लोकंच्या,वाचकाच्या गळ्यातील ताईत बनत होता. म्हणूनच लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील असंघटितांचा चमकता लाल तारा होता.

भारत देश स्वतंत्र झाल्याच्या १९५० ते १९६२ साल म्हणजे अण्णभाऊच्या साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत गेले. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. त्यामुळे तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागला. अण्णांभाऊनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता,माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ,फकिरा अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ३५ कादंबऱ्या लिहल्या त्यात ८ कांदबरीवर चित्रपट निर्माण झाले ते तुफान लोकप्रिर्य झाले १२ च्यावर कथासंग्रह लिहले त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी,गुजराती, उडीया,बंगाली,तमीळ,मल्याळी,अनेक भारतीय भाषांबरोबरच रशियन,झेक,पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी,विज्ञाननिष्ठ,स्त्रीवादी,लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती.कारण लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील असंघटितांचा चमकता लाल तारा होता.

अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या मागासवर्गीय-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला होता.रशिया अमेरिका देहातील राष्ट्रपती त्यांना   लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील असंघटितांचा  चमकता लाल तारा म्हणत होते.

अण्णाभाऊ च्या क्रांतिकारी विचारा पासुन मातंग समाज लांब आहे.उभे आयुष्य त्यांनी कम्यूनिस्ट चळवळीत घातले पण उच्च वर्णीय वर्गीय नेतृत्व करणाऱ्या या डाव्या कामगार चळवळी ने त्यांना मना पासून कधीच स्वीकारले नाही.शेवटी शेवटी अण्णाभाऊ नी भिमराव (बाबासाहेब) सांगितला पण त्यांच्या समाजाने आजही तो स्वीकारला नाही मातंग समाजाने कॉंग्रेस राष्टवादी नेतृत्व स्वीकारले पण आंबेडकरी नेतृत्व नाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या स्थापने पासुन इतिहास तपासला तर कोणाचा विकास झाला.हे दिसून येईल. 

महामंडळाचा अध्यक्ष जेलची शिक्षा भोगणारा झाला. अनेक कार्यकर्ते त्याचं वाटेवर आहेत.ज्याने अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची चळवळ उभी केली पाहिजे होती त्याने समाजाचे शोषण करणारी फळी उभी केली आणि समाजाला विकलांग बनविले अण्णाभाऊच्या जयंती दिनी व स्मुर्ती दिनी पूर्ण पण जाहिराती देवून राष्ट्रवादी ला मोठे केले. मातंग समाजाच्या तरुणांना आकर्षित केले. समाजाचा विकास व कल्याण करण्यासाठी असलेल्या महामंडळाचा राजकीय अड्डा बनविला.अण्णाभाऊ साठेचा वैचारिक वारसा सांगणारा तरुण घडविन्या ऐवजी राष्ट्रवादी मातंग कार्यकर्त्ता घडला.त्यामुळे आज सर्वच पक्षात मातंग आघाडी निर्माण झाली. तेच नेते समाजाला आंबेडकरी चळवळी पासुन चार हात लांब राहण्याचा सतत मार्ग दाखवितात.आणि स्वतःच्या जाती पुरते वेगळे आरक्षण असो,स्मारक असो त्याची मागणी तेव्हाच पुढे येते.भाजपा शिवसेना कॉंग्रेस त्याकरिता त्यांना सर्वपरीने प्रसिद्धी देऊन मदत करण्यासाठी पडद्या मागे तयार असते. त्यामुळे हेच कळत नाही कि यांचे  आंदोलन तीव्र करून ते कोणा विरोधात कोणासाठी लढतात हाच मोठा प्रश्न त्यांच्या व इतर समाजा समोर आहे. त्यामुळे खेड्या पाड्यातील मातंग समाज शोषण मुक्त झाला नाही.

 गावांत किंवा शहरातील आण्णा भाऊसाठे नगरातील तरुण शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या पासुन वंचित आहे.तो मोठ्या प्रमाणात देव,देवी,मरी आईच्या चक्रात अडकलेला असुन अज्ञान अंधश्रद्धा व्यसन यातून तो मुक्त नाही. त्यांचे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी विचारवंतानी आत्मपरीक्षण करण्याची तयारी केली पाहिजे.ज्यांनी ज्यांनी अण्णाभाऊ वाचला आणि समजून घेतला त्यांनी बाबासाहेब स्वीकारला,बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्ध धम्म स्वीकारला त्यांचा सामाजिक,शैक्षणिक,सांकृतिक आर्थिक विकास झाला आहे.ते आज धम्म प्रचार आणि प्रसारचे कार्य स्वताच्या घरातून करीत आहेत.त्यांचे कुटुंब अज्ञान अंधश्रद्धा व्यसनमुक्त झालेलं आहे.एक नाही अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हिंदू मातंग धर्म सोडून जाहीरपणे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.त्यांचे कार्य सर्व समाजासाठी व चळवळीसाठी प्रेरणादायी आणि लक्षवेधी आहे.त्यांचा आदर्श इतर मागासवर्गीय समाजानी घेतला पाहिजे.

मातंग समाज आज ही मोठ्या संख्येने असंघटीत कामगार आहे त्याला जाती म्हणून एकत्र केल्या जाते पण असंघटीत कामगार म्हणून संघटीत केल्या जात नाही.म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेले जागतिक पातळीवरील घोष वाक्य. "पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नसुन असंघटीत कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरळी आहे."  हे आण्णाभाऊ साठे यांनी छातीठोक पणे सांगितले,लिहिले आणि गायिले. हे त्यांचा समाजच आज ही मान्य करीत नाही असे लिहावे लागते . म्हणुन अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तो समाज गमावुन बसला. प्रतिमेची मूर्तीची पूजा करणे,जय जयकार करणे ही श्रद्धा परंपरा आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी आचरणात आणणे हा समाज परिवर्तनाचा मार्ग असणार आहे.त्यांच्या विचारांची जयंती जो पर्यन्त होत नाही तो प्रयन्त मातंग समाजाचा शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकास होणार नाही.लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील असंघटितांचा चमकता लाल तारा होता व कायम राहणार आहे. म्हणूनच त्यांच्या विचारांच्या चळवळीचे आत्मचिंतन आणि आत्म परीक्षणाची आवश्यकता आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम!. 

  
सागर रामभाऊ तायडे~
भांडुप मुंबई,9920403859.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com