
आरक्षण हक्क कृती समितीचे मुख्य राज्य निमंत्रक मा. हरिभाऊ राठोड साहेब(माजी खासदार) म्हणाले की शासनाने ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाने मागासवर्गीय समाजांमध्ये फोडा आणि झोडा या नीतीने अन्याय करणे सुरू केली आहे. याकरिता एसी, एसटी, डीटी,एनटी, एसबीसी व ओबीसी यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सहभागाने ठरवून दिनांक 26 जून ला होणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आयोजन आवाहन केले आणि या लढ्याला आर्थिक सहकार्य करण्याचे आव्हाहन केले.
कृती समितीचे राज्य निमंत्रक मा. सुनिल निरभवने यांनी मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. समाजामध्ये चेतना निर्माण करणे आवश्यक आहे. राज्य स्तरापासून आरक्षण हक्क कृती समिती राबवित असलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा दिला व आपल्याला जिल्हा स्तरावर काय काय करावे लागेल याचा सविस्तर कृती आराखडा सागितला आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. निधी गोळा करणे, जबाबदार्या वाटून घेणे, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
कृती समितीचे राज्य निमंत्रक मा. शरद कांबळे यांनी बँकिंग मध्ये होणार्या अन्याय अत्याचाराचा आलेख विषद केला. कृती समितीचे मुख्य राज्य निमंत्रक मा. संजय कांबळे बापेरकर मागासवर्गीय सर्व कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना,युवक संघटना, विद्यापीठीय विद्यार्थी व लोक प्रतिनिधी या सर्वांनी मिळून एकत्र लढा देण्याची आवश्यकता आहे त्यांनी प्रतिपादन केली. सहविचार सभेचे अध्यक्ष कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासनाची भूमिका आणि राजकारण्याचा दबाव यामुळे समाजपयोगी निर्णय निर्गमित करणे अवघड जाते. या नियोजन सभेच्या वतीने विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी समोर 26 जून २०२१ ला आयोजित केलेला आक्रोश मोर्चा यशस्वी करण्याचे राहुल भालेराव यांनी केले
0 टिप्पण्या