या संदर्भात पतंगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयासोबतच तहसील प्रशासनाकडे पत्र पाठविले आहे. शेती हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. शेतावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील काही वर्षात शेतीमध्ये लागवडीचा खर्चही निघाला नाही. शासनाची कर्जमाफीची योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही. एवढेच नव्हे तर शासनाने विकल तेच पिकल हि योजना हाती घेतली. मात्र यामध्ये पिकलच नाही तर विकणार काय असा सवाल उपस्थित केला आहे. जिल्हयातील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे बँकेकडे धुळखात पडलेली आहेत. बँकेकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर मागील कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. त्यातच भर म्हणजे विद्युत पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा विज कंपनीने सुरु केला आहे. आता गहू व इतर पिकांना पाणी देण्याची वेळ असतांना विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने गव्हाचे पिक देखील हाती येणार नाही. विज कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यावर्षीही बँका पिककर्ज देण्यास तयार नाहीत त्यामुळे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. या अफालातून पत्रामुळे सेनगाव तहसील प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या