Top Post Ad

मिरा भाईंदर पालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त पाणी मिळण्याकरिता आमदार प्रताप सरनाईक आग्रही

मिरा भाईंदर पालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त पाणी मिळण्याकरिता आमदार प्रताप सरनाईक आग्रही



भाईंदर
मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 150 द.ल.ली. पाणी मिळण्याबाबत  शिवसेनेचे पक्ष प्रवक्ते मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची आज ( १४ ऑक्टोबर) मंत्रालयात भेट घेतली.  मिरा भाईदर शहर हे मुंबईलगत असल्याने मुंबई काम करणारा कर्मचारी वर्ग वास्तव्यासाठी शहरामध्ये स्थलांतरीत होत असल्याने तसेच शहरामध्ये उद्योगधंदयामध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. सदयाची लोकसंख्या व उपलब्ध पाणी पुरवठा पाहता सदयस्थितीत सुमारे 50 दे.ल.ली. पाणी अपुरे पडत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 


शहरासाठी सदया सुमारे 236 द.ल.ली. पाण्याची आवश्यकता आहे व मंजूर पाण्याचा कोटा 86 द.ल.ली. स्टेम प्राधिकरण व 125 द.ल.ली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे कडून असा एकत्रित 211 द.ल.ली. पाणी मंजूर आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ फक्त् 100 द.ल.ली. पाणी पुरवठा करत आहे. यास्तव शहरास एकंदरीत 50 द.ल.ली. पाणी पुरवठा मागणीपैक्षा कमी होत आहे. शहराची भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी सुर्या प्रकल्पातून 218 द.ल.ली. पाणी आरक्षीत आहे. मात्र सदरचे पाणी उपलब्ध होण्यासाठी अदयाप दोन ते तीन वर्षाचा कालावधी अपेक्षीत आहे: तो पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर कोटयापेक्षा कमी होत असलेला 25 द.ल.ली. व वाढीव 25 द.ल.ली. असा एकूण 50 द.ल.ली. पाणी पुरवठा शहरास करण्यात यावा.अशी मागणीही सरनाईक यांनी केली. 


 कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी जुलै 2019 मध्ये बारवी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा निर्माण झाल्यानंतर मिरा भाईंदर शहरास मंजूर पाणी पुरवठा करावा व तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात पावसाळ्याच्या कालावधीत 25 द.ल.ली. पाणी वाढविण्यात यावे. असे निर्देश दिलेले होते. त्यानुसार मिरा भाईंदर शहरास 25 द.ल.ली. पाणी वाढवून सुमारे 115 द.ल.ली. इतके पाणी शहरास पुरवठा करण्यात येत होते. मात्र त्यानंतर मार्च 2020 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी सदर तात्पुरत्या स्वरुपातील चालू केलेले पाणी पत्र देऊन बंद केलेले आहे. शहरास सदया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर 125 द.ल.ली. पैकी 100 द.ल.ली. पाणी प्राप्त होत आहे. यास्त्व उर्वरीत 25 द.ल.ली. पाणी तात्काळ शहरास उपलब्ध होणे आवश्यक आहे.


तसेच सुर्या प्रकल्पाचे पाणी शहरास उपलब्ध होईतोपर्यंत शहराची सदयाची पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी अधिकचे 25 द.ल.ली. असे एकूण 150 द.ल.ली. पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणेबाबत संबंधीत आधिकाऱ्यांसोबत शासनस्तरावर बैठक आयोजित करण्यासाठी सरनाईक यांनी विनंती केली. सरनाईक यांच्या विनंतीवरून मंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ सोमवार दि. १९  ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३०  मंत्रालयातील दालनात बैठक लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना  दिले आहेत  खासदार राजन विचारे , आमदार गीता जैन , महापौर ज्योत्सना हसनाळे , माजी आमदार मुझफ्फर हुसैन , आयुक्त विजय राठोड या बैठकीस उपस्थित राहणार आहेत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com