Top Post Ad

पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंटवर बँकेकडून मिळणारे फायदे 


रोजच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी अपघाती निधन होताना आणि आजाराने नैसर्गिक मृत्यू होताना .आपण पाहिले असेल त्यामध्ये आपले परिवारातील काही सदस्य असतील किंवा मित्रपरिवार असतील. त्या घरातील कर्ता पुरुष अपघाती किंवा एखाद्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबावर येणारी आर्थिक बिकट परिस्थिती ही आपण आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी अनुभवले असेल आणि या सर्व कारणांमुळे आपले सॅलरी अकाऊंट किती महत्त्वाचे आहे आणि ते योग्य बँकेमध्ये ठेवणे. किती महत्त्वाचे आहे . ज्यामुळे आपल्या अनुपस्थिती मध्ये आपल्या घरच्यांना आर्थिक मदत होईल. 

शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत
1) अपघात झाल्यास.10  लाख रुपये (महसूल विभाग व वित्त विभाग)
2)  NPS किंवा जीपीएफ मधील जमलेली रक्कम
3) नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास. (पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत दिली जाते. मात्र इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला शासनाकडून विशेष मदत दिली जात नाही* दिली जात असेल चांगला आहे. मात्र ठोस माहिती नाही. )
4) दहा वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास. दहा लाख रुपयाची मदत (2005 नंतर भरती झालेले कर्मचारी अधिकारी आणि दहा वर्षाच्या आत निधन झालेल्या  कर्मचाऱ्यांसाठी. दहा लाख समग्र अनुदान ( दिनांक 29 सप्टेंबर 20 19 वित्त विभाग मार्फत जाहीर झालेला शासन निर्णय नुसार)  
5) गटविमा  3.60 लाख
6) अनुकंपा तत्वावर नोकरी  याबाबत वास्तव
(याबाबत निदर्शनास आणू इच्छितो की अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांना अनुकंप तत्वावर नोकरी लागण्यासाठी किमान एक ते दोन वर्ष लागतात. मात्र इतर शासकीय विभागांमध्ये अनुकंपा खाली नोकरी लागण्यासाठी किमान *पाच ते दहा वर्ष लागतात याचा आपण अनुभवी घेतला असेल. तसेच अनुकंपा खाली नोकरी फक्त क गटातील व ड गटातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आहे. विशेष बाब म्हणून ( अ गटातील कर्मचारी ब गटातील कर्मचारी. नक्षलवादी किंवा आतंवादी किंवा समाज विघातक कृत्याच्या वेळी कर्तव्य बजावत असताना निधन झाले असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते.)  

शासन निर्णय सामान्य प्रशासन दिनांक 21 सप्टेंबर 2017 जीआर नुसार ) या व्यतिरिक्त शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा निधन पावलेल्या कुटुंबियांना दिल्या जात नाहीत. शासनाकडून मिळणारी रक्कम ही खूप अल्प प्रमाणात आहे. आणि आपल्या कुटुंबावर भविष्यात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. याचा आपण कधीच जाणीवपूर्वक विचार करत नाही. जे मी बोललो आहे ते आपण नक्कीच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा मित्र परिवाराच्या निधनानंतर आपण अनुभवले असाल. ( *म्हणून मला सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या  बँकेमध्ये पगार खाते उघडल्यामुळे जास्त फायदे आहेत. त्या बँकेमध्ये आपले पगार खाते उघडा  तर तुमच्या अनुपस्थितीमध्ये कुटुंबाला जास्तीत जास्त मदत होऊन आर्थिक संकटाला तोंड देता येऊ शकते )

सर्व बँकेचे बेनिफिट पाहिल्यावर आपल्या असे निदर्शनास आले असेल की एखादी बँक अपघात विम्याची रक्कम वीस लाख देते आणि एक बँक अपघात विमा दहा लाख देते किंवा एखादी बँक नैसर्गिक मृत्यू साठी  पाच लाख रुपये देते. आणि एखादी बँक नैसर्गिक मृत्यू साठी काही मदत देत नाही यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्यासाठी एक तर  संबंधित बँकेला ते बेनिफिट देण्यासाठी भाग पाडा किंवा  आपले पगार खाते ज्या बँकेमध्ये जास्त बेनिफिट आहेत त्या बँकेमध्ये ठेवा. ही नम्र विनंती
 (मी कोणत्याही बँकेचा प्रवक्ता किंवा शासनाचा प्रवक्ता नाही मी गेल्या काही तीन ते चार  वर्षांमध्ये. महाराष्ट्रातील विविध निधन पावलेल्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांना शासनाच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून दिले आहेत. त्यातून आलेले अनुभव मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या किंवा लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कुटुंबातील सदस्यांवर कोणत्या प्रकारचे आर्थिक संकट येऊ शकते याबाबत मी महाराष्ट्रातील असंख्य कुटुंब जवळून पाहिले आहेत. ही वेळ आत्ता ाम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना येऊ नये. म्हणून आपल्याला जनजागृती करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे.

शासकीय ,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि  कर्मचारी यांच्या
पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे फायदे 

(शासनाचा कोणताही जीआर नाही आहे .की पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट याच बँकेत असावे. असा कोणताही जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही.  प्रत्येक अधिकारी  आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते. ( संदर्भ .दिनांक 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय)  2) इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा इतर विभाग


A) ॲक्सिस बँकेत मध्ये पगार खाते असेल तर पुढील प्रमाणे लाभ.
1) अपघात.  20 लाख
         (एखादा कर्मचारी अपघाती निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना  20 लाख रुपये दिले जातात)
2) नैसर्गिक मृत्यू 5 लाख
        (एखादा कर्मचारी नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला  पाच लाख रुपये मदत दिली जाते.)
3) मेडिक्लेम 2 लाख ते 15 लाख पर्यंत
    ( फक्त 1,999 रुपये भरून मेडिक्लेम दिला जातो. त्या मेडिक्लेम मध्ये दोन मुले व पती पत्नी यांचा समावेश होतो
4) मेडिक्लेम. 20 हजारा पर्यंत मोफत
      ( शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी 20 हजारापर्यंत मोफत मेडिक्लेम )

B) बँक ऑफ महाराष्ट्र पगार खाते
1) अपघाती निधन. 40 लाख
2) कायम अपंगत्व.  40 लाख
3) कमी प्रमाणात अपंगत्व  20 लाख
4) अपघाती उपचारासाठी       1 लाख
5) हवाई अपघात. 1 कोटी
6)  नैसर्गिक मृत्यू  मदत नाही
7) मेडिक्लेम. कोणत्याही मदत नाही
_8)RUPEY PLATINUM ATM CARD विमा 2 लाख वेगळा,

C) बँक ऑफ बडोदा पगार खाते असेल तर
1) अपघाती निधन 40 लाख
2) पूर्णता अपंगत्व.  काही मदत नाही 
3) नैसर्गिक मृत्यू. काही मदत नाही
4) मेडिक्लेम . कोणतीही मदत नाही 
5) विमान अपघात कोणतीही मदत नाही

   D) बँक ऑफ इंडिया. पगार खाते असेल तर.
1) अपघात विमा. 30 लाख
2) पूर्ण अपंगत्व.  30 लाख
3) कमी अपंगत्व.15 लाख
4) मेडिक्लेम .कोणतीही मदत नाही
5) नैसर्गिक मृत्यू . कोणतीही मदत नाही
6) विमान अपघात  कोणतीही मदत नाही

E) एसबीआय (SBI)  पगार खाते असेल तर
1) अपघाती निधन  20 लाख
2) ATM विमा 5 लाख
3)  हवाई अपघात. 30 लाख
4) नैसर्गिक मृत्यू. कोणतीही मदत नाही
5)  मेडिक्लेम . कोणतेही मदत नाही 


( वरील सर्व माहिती संकीर्ण 2019/प्रक्र 141/2019/ प्रशा 5 /
दिनांक. 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय मुंबई 4000 32)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com