Top Post Ad

शहापूर तहसीलदारांची तात्काळ बदली करा - वंचित बहुजन आघाडी

शहापूर तहसीलदारांची तात्काळ बदली करण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी 

 

शहापूर 

 

    शहापुर सारख्या दुर्गम तालुक्यात कोविड-१९चे ११ रुग्ण बाधित असतांना यासाठी स्थानिक आमदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्याशी योग्य समन्वय न ठेवता आपल्या एकाधिकारशाहीचा वापर करणाऱ्या शहापूरच्या तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निलीमा सुर्यवंशी यांची तत्काळ इतरत्र बदली करण्यात यावी. अशी तक्रार ईमेलद्वारे वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली आहे .

 तहसीलदार या आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असतांना शहापुर या ठिकाणी मुख्यालयीन न राहता ठाणे येथून ये-जा करीत आहेत कोविड-१९ शी लढतांना आपत्ती व्यवस्थापन टीम म्हणून इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे कोणत्याही प्रकारे सरकारी खर्च मदत देणगी याबाबत आणि कोरोनासंबंधी उपचार आणि उपाय याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांना राजकीय पदाधिकाऱ्यांना अधिकृत माहिती न देणे सरकारी माहिती दडवून ठेवणे   तसेच कोविड-१९ चा शहापूर तालुक्यात सध्या वाढता धोका लक्षात घेता तहसिलदार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनकडून कोणत्याही वेळीच उपाययोजना केल्या नाहीत

परिणामी केवळ तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांच्या बेफिकीरपणे  वागण्याचा परिणाम ठाणे जिल्हयातील शहापूर सारख्या ग्रामीण भागात कोरोनाचे रोज रुग्ण वाढत आहेत एकिकडे शासन कोविड १९ कोरोना या आजाराला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन कोरोना रोखण्यासाठी कुठलेही नियोजन तहसीलदारांनी केलेले दिसून येत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेत प्रचंड भीतीचे वातावरण आहे तहसीलदार या लोकसेवक शासनाचे नोकर म्हणून आपले कर्तव्य न बजावता तहसीलदार या बेजबाबदारपणे वागत आहेत व कर्तव्यात कसूर करुन हुकूमशाही पध्दतीने आपल्या मर्जीप्रमाणे तहसीलदार आपला कारभार चालवीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने आपल्या तक्रारीत केला आहे 

 


 

तहसीलदार यांंनी कोरोना आपत्ती बाबत उपाययोजना करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे  अशा मनमानीपणे वागणाऱ्या शहापूर तहसीलदार यांची तात्काळ येथुन अन्य ठिकाणी बदली करावी व एखाद्या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक तहसीलदारांची शहापूर येथे नेमणूक करावी. अशी आमची मागणी आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे हे निवेदन इमेलद्वारे वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी बुुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .हे तक्रारीचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील देण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com