Top Post Ad

व्होट चोरी विरोधात महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांचा मुंबईत विराट मोर्चा

 निवडणूक स्वच्छ, पारदर्शक असायला हवी यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख प्रादेशिक पक्ष लढत आहेत.  निवडणूक आयोगाकडे सातत्याने बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये सर्व पक्षांचे प्रमुख नेते होते. आमच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत जे मुद्दे मांडले ते निवडणूक आयोग मानायला तयार नाही. निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य केलं आहे. ते ऐकत नसल्याने सर्वांचं एकमत झालं आहे, त्यांना रस्त्यावर उतरुन दणका द्यावा लागेल.  येत्या 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा निघेल, अशी मोठी घोषणा संजय राऊत पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत दादरच्या शिवसेना भवन येथे ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


आज सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष लढाई लढत आहोत. ही लढाई आम्ही दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढतोय. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही लढाई सुरु झाली आहे. त्यातून काय निष्पन्न होईल त्या विषयी शंका आहे. निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे. या मॅच फिक्सिंग विरुद्ध आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख बोगस मतदार आहेत. म्हणजेच जवळपास 1 कोटी मतदार, हे मतदार आमच्या मते घुसखोरच आहेत. या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे.  निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारा विरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या गावागावातून, जिल्ह्या-जिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचं नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मविआतील इतर नेते करतील. त्या दृष्टीने पुढील पावलं टाकली जातील. अशी  माहिती संजय राऊत यांनी दिली.

"पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीर व्यासपीठावरुन सांगितलं की, माझ्या निवडणुकीला 20 हजार मतदार बाहेरुन आणले आणि मी जिंकून आलो. दुसरं म्हणजे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचंदेखील महत्त्वाचं वक्तव्य आहे. त्या म्हणतात, यापूर्वी मी लढवलेल्या सर्व निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती. पण ती नावे कधीच कमी झाली नाहीत. अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंद घेतात, असं सत्ताधारी पक्षाच्या आमदार सांगत आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41 हजार आणि बेलापूरमध्ये 35 हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगत आहेत. बुलढाणामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड सांगत आहेत की थेट 1 लाखांपेक्षा जास्त बोगस मतदार निवडले गेले. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीत जो त्यांचा खासदार बोगस मतदारांच्या मदतीने जिंकला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात मतांमध्ये घोटाळा करुन ते सत्तेवर येत आहेत. मतदार याद्या स्वच्छ असायला हव्यात यासाठी हा संघर्ष असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाच्या प्रमुखांसोबत चर्चा केली, त्यावर आलेलं उत्तर समाधानकारक नसल्यामुळं हा मोर्चा काढला जातो आहे. सत्तेतील लोक सुद्धा या मोर्चात आले तरी हरकत नाही. तसंच ज्यांना या प्रकारामुळं फायदा झाला, त्यांना हे मान्य करायचं नाही," असं म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. पुढं ते म्हणाले, "अनेक उदाहरणं आहेत. निवडणूक आयोगानं चुका सुधारण्याची तयारी करायला हवी. डुब्लिकेट मतदार आणि यादीत चुकीचा पत्ता, या सर्व बाबींचा विचार करता...कोणते निकष लावणार हे स्पष्ट करावं," असं सांगत जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com