Top Post Ad

मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्पाला गती.. सोमवार २२ सप्टेंबर रोजी पहिल्या फेजचे ट्रायल रन

वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने मेट्रो लवकरच सुरु केली जाणार आहे. ठाणेकरांची पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे.  ठाण्यातील मेट्रो मार्गिका ४-४ अ मधील १० स्थानकांवर ट्रायल रन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रायर रन करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली होती. मेट्रो लाईन -४ मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्धपातळीवर काम सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका ४-४ अ या मार्गिकवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले होते.  सोमवार २२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो प्रकल्पातील १०.५ किमीच्या पहिल्या फेजचे ट्रायल रन होणार आहे. ठाणे मेट्रो मार्गिकेवर  १) कॅडबरी २) माजीवाडा ३) कपूरबावाडी ४) मानपाडा ५) टिकूजी-नी-वाडी ६) डोंगरी पाडा ७) विजय गार्डन, ८) कासरवाडावली, ९) गोवानिवाडा १०) गायमुख ही स्थानकं असणार आहेत.

 एकीकडे ठाण्यात वाहतुक कोंडीच्या समस्येवर ठाणेकर आक्रमक होत असतानाच मुंबईसह ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए (हिरवी मार्गिका) प्रकल्पाला गती मिळाली आहे. वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली–गायमुख या मार्गावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ प्रवाससुविधा निर्माण करणार नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासालाही चालना देईल. ठाण्याच्या जनतेचे मेट्रो मधून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याबरोबरच गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे भविष्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ठाणे सारख्या महानगराला आधुनिक वाहतुकीची कास धरावी लागणार हे वास्तव आता टाळता येणार नाही. मेट्रो मार्ग ४ व ४ए या दृष्टीने नवा टप्पा ठरेल. आज वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि तासन्‌तास वाया जाणारा वेळ हे सर्व प्रश्न जटिल झाले आहेत. अशा वेळी पर्यावरणपूरक, सुरक्षित व जलदगती मेट्रो हा प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.

  मेट्रो मार्ग ४ व ४ए  मार्गाची एकूण लांबी ३५.२० कि.मी. असून यात मेट्रो मार्गिका ४ – ३२.३२ कि.मी. व ४ए – २.८८ कि.मी. आहे. गाड्या ८ डब्यांच्या असतील व प्रतितास प्रतिदिशा प्रवासी संख्या (PHPDT) ३३,४१७ एवढी असेल. मेट्रो मार्ग ४ पूर्ण झाल्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगरांमधील दुवा अधिक मजबूत होणार आहे. यामुळे व्यवसाय केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि शैक्षणिक संस्थांना थेट फायदा मिळणार आहे. हा मार्ग दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा–सीएसटीएम) व उत्तरेला मेट्रो मार्ग ४ए (कासारवडवली–गायमुख) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग १० (गायमुख–मीरा रोड) यांच्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई–ठाणेकरांसाठी अखंड प्रवासाची सोय होणार आहे. या विस्तारानंतर एकूण लांबी ५८ कि.मी. होणार असून हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो मार्ग ठरेल. दररोज तब्बल २१.६२ लाख प्रवासी प्रवास करतील, प्रवास वेळेत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत बचत होणार असून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com