Top Post Ad

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आत्मदहन

 महाबोधि महाविहार ब्राह्मणी पंडीतांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी बीटी एक्ट रद्द झालाच पाहिजे. या प्रमुख मागणीकरीता बोधगया बिहार येथे मागील दोन महिन्याहून अधिक दिवस भिक्खू संघाचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या विरोधात महाराष्ट्रासह देशातच नाही तर संपूर्ण जगात बौद्ध समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत  असतानाच मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी 12 मे वैशाखी वैशाखी बुद्ध पौर्णिमा दिनी चैत्यभूमीवर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे, या आंदोलनाची दखल घेऊन शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे, 


      सुरेश गायकवाड हे नेहमीच आंबेडकरी आणि सामाजिक आंदोलनामध्ये पुढे असतात. गेले 31 वर्ष ते विविध प्रश्न घेऊन आझाद मैदानात आंदोलन करतात.  स्वतंत्र मतदार संघ मिळाले पाहिजे, स्वतंत्र विदर्भ मिळाला पाहिजे, भारतामध्ये नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात यावा. आदी विविध प्रश्न घेऊन ते सातत्याने आंदोलन करत असतात. त्यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखलही घेतली जाते. नदीजोड प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरेश गायकवाड यांनी  आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे, त्यामुळे आंदोलनाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे, काही झालं तरी हे आंदोलन मागे घेणार नाही, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे, असे आंदोलनकर्ते सुरेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे, 1993 वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरेश गायकवाड हे सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com