आपले वीर सशस्त्र दल 140 कोटी भारतीयांच्या स्वातंत्र्याचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करत आहेत जे त्यांचे सदैव ऋणी राहतील. त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला आमचा आदर आणि श्रद्धांजली म्हणून, लोढा फाउंडेशन ऑपरेशन सिंदूर दरम्यान आमच्या सशस्त्र दलातील प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबाला विनम्रपणे मदत करेल: सर्व देशवासीयांनी आज भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहून सैनिकांचे मनोधैर्य व मनोबल वाढविले पाहिजे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपापसातील मतभेद हेवेदावे विसरून सर्वांनी मिळून शत्रूला आपली ताकद दाखवलाय हवी, असे प्रतिपादन करीत या युद्ध सराव हल्ल्यात शहीद आणि जखमी झालेले जवान व नागरिकांसाठी मदत देण्याची घोषणा अभिषेक लोढा यानी मुंबईत केली .यावेळी त्यांच्या मातोश्री मंजू लोढा ,पत्नी विनिता अभिषेक लोढा , मेजर.मानवेंद्र सोलंकी आणि मेजर असिफ सय्यद हे उपस्थित होते.
आज १० मे रोजी मुंबई प्रेस क्लबमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ह्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार लोढा फाउंडेशन उचलणार असून जखमी सैनिक आणि नागरिकांना मदत केली जाईल . त्याशिवाय शहीद जवानांच्या विधवा पत्नीना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्यांना स्वतंत्र व्यवसाय करावयाचा आहे त्यांना आर्थिक पाठबळ देऊ आणि ज्या भगिनींना आमच्या सोबत जोडायचे तर त्यांनाही लोढा फाउंडेशन मध्ये रोजगार दिला जाईल .तसेच शहीद जवानांच्या परिवाराचा आरोग्य विमा लोढा फाउंडेशन तर्फे काढला जाईल .अशी माहिती संस्थेचे संचालक अभिषेक लोढा यांनी दिली.पेहलगामच्या निसर्ग रम्य खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारने यशस्वीपणे"ऑपरेशन सिंदूर " राबवून दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा दिला त्याबद्दल लोढा फाउंडेशनने भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांचं कौतुक केलं. लोढा फाउंडेशन राबवत असलेल्या योजनेची प्रेरणा आणि संकल्पना ही माझी आई मंजू लोढा आणि पत्नी विनिता यांची आहे .असेही अभिषेक लोढा यांनी स्पष्ट केले. तर भारतभूमी ही युद्धभूमी नव्हे तर शांतता प्रिय आणि शांततेचा संदेश देणारी भुमि आहे. अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी दिलेले बलिदान म्हणजे आजचे स्वातंत्र्य असे सांगून यावेळी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत त्यांच्यासाठी आणि सीमा रेषेवरील जवानांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे असे मंजू लोढा यांनी सांगितले.
- 1. लोढा फाउंडेशन शहीदांच्या मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षणासाठी निधी देईल. यामध्ये फी, पुस्तके आणि वसतिगृहाचा खर्च समाविष्ट असेल. याव्यतिरिक्त, लोढा जीनियस प्रोग्राम या मुलांसाठी प्रगत शैक्षणिक कार्यक्रम आणि मार्गदर्शन प्रदान करेल.
- 2. शहीदांच्या पती-पत्नींना कौशल्य आणि उद्योजकता सहाय्याद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी पाठबळ दिले जाईल. ते इच्छुक असल्यास, त्यांना लोढा ग्रुप तसेच लोढा फाउंडेशनमध्ये नोकरीत प्राधान्य दिले जाईल,
- 3. फाऊंडेशन शहीदांच्या पालकांसाठी पुढील 20 वर्षांसाठी आरोग्य विम्याची व्यवस्था करेल.
पुढे, समविचारी नागरिक आणि कॉर्पोरेट्सना भारताच्या शूरवीरांना पाठिंबा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी, फाउंडेशनने 'ऑपरेशन सिंदूर/देशभक्त निधी' ची स्थापना केली आहे - या निधीतील सर्व देणग्या मदतीसाठी वापरल्या जातील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्राण गमावलेले किंवा कायमचे अपंग झालेले आमचे सैनिक आणि नागरिक यांची कुटुंबे.लोढा फाउंडेशन आमच्या सरकारला आणि सशस्त्र दलांना आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही प्रकारे पूर्ण मनाने पाठिंबा देण्यास तयार आहे. अधिक तपशिलांसाठी, कृपया फाउंडेशनच्या https://www.lodhagroup.com/lodhafoundation/operation-sindoor-fund/ येथे भेट द्या किंवा आम्हाला sindoor.patriots@lodhafoundation.org वर ईमेल करा.
पहलगाम की सुंदर घाटी में आतंकवादियों द्वारा किए गए कायराना हमले का बदला लेने के लिए केन्द्र सरकार ने ऑपरेशन सिंदूर को सफलतापूर्वक शुरू किया और पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब दिया। लेकिन इसमें हमने अपने कुछ सैनिक भी खोये हैं। इन शहीद सैनिकों के परिवारों को भारतीय सेना के राहत कोष से सहायता मिलती रहती है। किंतू ऑपरेशन सिंदूर में शहीद और घायल हुए सैनिकों और नागरिकों को सहायता प्रदान करना हमारा भी कर्तव्य बनता है। इसी हेतू से लोढा की तरफसे इन सभी शहीद जवानोंके परिवारको और जो जखमी हुए है, उन जवानो को हर तरहकी सहायता की जाएगी यह घोषणा अभिषेक लोढ़ा ने आज मुंबई में की. इस अवसर पर उनकी माता मंजू लोढ़ा, पत्नी विनीता अभिषेक लोढ़ा, मेजर मानवेन्द्र सोलंकी और मेजर आसिफ सैयद उपस्थित थे। मुंबई प्रेस क्लब में मीडिया से बात करते हुए उन्होने कहा
0 टिप्पण्या