Top Post Ad

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली असली, तरी जातीय जनगणना होणार नाही

केंद्रातील मोदी सरकारने जातनिहाय जनगणना (Cast census) करण्याची घोषणा केली. केंद्रीय कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषेदतून दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी देखील हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले. मात्र, या निर्णयाचे राजकारण होता कामा नये, बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जातोय, अशी टीकाही केली.  मात्र या निर्णयाचे समता परिषदेने स्वागत करत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. 1992 पासून समता परिषदेच्या माध्यमातून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती. आज अखेर कैद्रातील भाजपच्या  सरकारने हा निर्णय घेतला आणि हे मोठं यश असल्याचं सांगण्यात आलं. बीड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला आहे. 

 जातीय जनगणना केल्याने समाजाच्या अखंडतेला धोका निर्माण होतो असे आजपर्यंत जे लोक म्हणत होते, त्यांनीच जातीय जनगणनेची घोषणा केली आहे. या घोषणेमागचे कारण संसदेमधील विरोधी पक्षांचा दबाव आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. ज्यांनी जातीय जनगणनेची घोषणा केली  त्यांचाच कोणीतरी एखादा माणूस कोर्टामध्ये याचिका दाखल करेल. याचिका दाखल केली की मग सरकारला जातीय जनगणना करता येणार नाही.  दाखल केलेल्या याचिकेवर वर्षानुवर्ष सुनावणी होणारच नाही आणि जोपर्यंत सुनावणी होणार नाही तोपर्यंत जातीय जनगणना होणार नाही.  ज्याप्रमाणे राजस्थानच्या हायकोर्टाच्या प्रांगणामध्ये मनूचा पुतळा बसविण्यात आल्यानंतर. सर्वप्रथम ज्यांनी तो पुतळा बसविला त्यांच्याच पैकी एका व्यक्तीने कोर्टात याचिका दाखल केली.  यावर अद्यापही कोर्टाने कोणताही निर्णय दिलेला नाही. आता जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणीही हायकोर्टाच्या प्रांगणातील तो मनूचा पुतळा कोणी हटवू शकत नाही, ही आहे खरी षडयंत्रकारी रणनीती..ठीक याचप्रमाणे जातीय जनगणनेच्या विरुद्ध कोणीतरी याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही, याचिकेचा निर्णय वर्षानुवर्ष येणार नाही, मग जातीय जनगणना होणार तरी कशी?  प्रा. गंगाधर नाखले  7972722081

केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी तो फसवा निर्णय असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, सरकारने अद्याप जनगणना कधी करणार? याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जातीय जनगणना करणे शक्य नाही. यामुळे केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आणि दिशाभूल करणारी आहे, 2026 मध्ये होणाऱ्या परिसीमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हेतुपुरस्सर जनगणना लांबवत आहे . "जर जनगणनाच झाली नाही, तर जातीय जनगणना कशी होणार? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे,... तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसक घटनेमुळे देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा हा निर्णय घेतला का?" .., ॲड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी 

सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय अतिशय ऐतिहासिक प्रकारचा निर्णय आहे. भारतामध्ये 1931 नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होत आहे.  सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोचवायचा असेल या जनगणनेच्या माध्यमातून समाजामध्ये कोण मागे राहिला आहे, याचा इम्पेरिकल डेटा सुद्धा येईल. त्यामुळे योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशाला आणि समाजाला पुढे घेऊन जाता येईल, आता सामाजिक न्यायाचं नवीन पर्व सुरू झाला आहे, - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारला अखेर काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्या मागणीपुढे झुकावे लागले आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा केवळ सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊलच नाही तर राहुल गांधींची दूरदृष्टी, विचारसरणी आणि सततच्या संघर्षाचा विजय आहे,  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. "ज्यांची जेवढी लोकसंख्या जितका वाटा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली होती. हा फक्त आकडेवारीचा प्रश्न नाही तर देशातील कोट्यवधी वंचित, दलित आणि आदिवासींना ओळख आणि अधिकार प्रदान करण्याच्या दिशेने घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. जातनिहाय जनगणना करण्यास सरकारला भाग पाडू अशी आग्रही भूमिका राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही घेतली होती. भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते पण अखेर मोदी सरकार नरम झाले व राहुल गांधी यांची मागणी किती रास्त आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे.   काँग्रेसने नेहमीच सामाजिक न्यायासाठी लढा दिला आहे. राहुल गांधी यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेल्या सामाजिक न्याय आणि समानतेच्या स्वप्नाला आणखी एक आयाम दिला आहे आणि मनुवादी शक्तींना पुन्हा एकदा नतमस्तक व्हावे लागले आहे. कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा इशाराही राहुल गांधी यांनी दोन महिने आधीच दिला होता पण मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते - खासदार वर्षा गायकवाड 

 केंद्र सरकार जनगणना करत आहे चांगली गोष्ट आहे. इंग्रजांनी केलेली जनगणना आहे, त्यानंतर जनगणना झाली नाही. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल, किती संख्या आहे हे कळेल,  मला वाटतं जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी. कारण बाठिया आयोगाने आत्ताच रिपोर्ट दिला आहे, त्या शिफारशी जरी लागू केल्या तरी भागतं. जनगणना करण्याची आवश्यकता नाही. मात्र, सरकारची इच्छा आहे, तर केली तरी हरकत नाही, जो आयोग किंवा समिती गठीत केली जाईल, त्यातील लोक मात्र निपक्षपाती असावेत. नाहीतर फुगून आकडा सांगितला जायचा, त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक पाहिजे. त्यांनी खरी संख्या समोर आणली पाहिजे, तसेच, आरक्षणाचा कोटा सुद्धा त्यांनी 72 टक्क्यांपर्यंत करायला पाहिजे. त्यामुळे आरक्षण सर्वांनाच पुरेल, आमचं आरक्षण यांनी 75 वर्षे खाल्ले, सरकारने नि:पक्षपातीपणाने जनगणना करावी.-  मनोज जरांगे पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com