Top Post Ad

मुंबईसह शहरांतील घरांच्या प्रश्नाला सर्वच सरकारांची गृहनिर्माण धोरणं कारणीभूत

. समता शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जालिंदर अडसुळे यांच्या घरहक्क चळवळीतील अनुभवावर आधारित विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले लेख तसेच विविध परिषदांमध्ये मांडलेल्या पेपर्स चे पुस्तक नुकतेच मुंबई प्रेस क्लब मध्ये प्रकाशित झाले.त्यावेळी डॉ.जालिंदर अडसुळे यांनी वरील प्रतिपादन केले.    विलास वाघ मेमोरिअल फाउंडेशनने पुरस्कृत केलेले डॉ.अडसुळे लिखित लोक साहित्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “लाईफ, टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्स-थिअरी आणि एक्स्पिरियन्स” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. 



 विलास वाघ मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. उषा  वाघ यांनी झोपड्यामधे राहणा-या कामगार वर्गानेच मुंबई सह सर्वच शहरवासियांचे जीवन सुखमय केले. त्यांनाही शहरातच हक्काचा निवारा मिळून त्यांचे जीवन आनंदाचे आणि सुखासमाधानाचे व्हायला हवे. असे प्रतिपादन केले. पुस्तकाच्या निर्मितीमधे परिश्रमपूर्वक भूमिका पार पाडणाऱ्या प्रा. रचना अडसुळे व त्यांच्या टिमचे प्रा. उषा वाघ यांनी तोंडभरून कौतुक केले.

युवा संस्थेचे संस्थापक मिनार पिंपळे यांनी नैसर्गिक साधन सामुग्रीवर केवळ सरकारने निर्णय घेण्याची परिस्थिती आज राहिलेली नसून नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपासाठी सरकार आणि समाजाबरोबरच मार्केटचा हस्तछेप महत्वाचा ठरू लागल्याने गृहनिर्माण सह सामान्यांचे जीवन प्रश्न गंभीर झाल्याचे म्हटले. डॉ.हेजल डिलीमा आणि घर हक्क चळवळीतील संजय शिंदे यांनी त्यांचे विचार मांडले. झोपडपटटयाना कामगार कॉलनी म्हटले जावे. असे शिंदे यांनी म्हटले. निना शाह-मोरे यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन केले तर प्रा.रचना अडसुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी समाजकार्य क्षेत्रातील एकॅडेमिशिअन्स, घर हक्क चळवळीसह सामाजिक संस्थांचे मान्यवर कार्यकर्ते यामधे  डॉ. हेजल डिलिमा, फरिदा लांबे, भिम रासकर, मिनार पिंपळे, अंजली कानिटकर, अंजली, अंजली गोकर्ण,.नायक इ.ची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com