महाबोधी महाविहाराची निर्मिती सम्राट अशोकाने केली. सम्राट अशोकाच्या ८४ हजार बुद्ध विहारांपैकी हे एक महत्त्वाचे महाविहार आहे. सम्राट अशोकाने बुद्धाच्या स्मरणार्थ या ठिकाणी बोधीवृक्ष आणि स्तूपांची पूजा देखील सुरू केली. या महाविहाराच्या उभारणीसाठी सम्राट अशोकाने एक लाख सोन्याची नाणी दान केली होती, असे बारीक तपशील आणि ऐतिहासिक कागदपत्रे दाखवतात. मध्य प्रदेशातील अशोक काळातील भरहुतच्या शिलालेखात 'भगवतो शाक्य मुनिनो बोधी' म्हणजेच 'भागवत शाक्य मुनींचा बोधी' असे लिहिलेले आहे. तसेच महाबोधी महाविहाराच्या मंदिराची प्रतिकृतीही शिल्पांमध्ये दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जुन्नर गुहेतही बोधीवृक्षाचे चित्रण आहे. महाबोधी महाविहार शोधण्याचे काम मेजर मिड आणि सर मेजर जनरल कनिंगहॅम यांनी केले. 1891 मध्ये महाबोधी महाविहारचे उत्खनन काम मिस्टर कनिंगहॅम यांनी स्वखर्चाने केले. वज्रासन, बोधीवृक्ष, राजा अशोकाने केलेला कठडा आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या आधारे महाबोधी महाविहाराचे मुख्य स्थान सापडले. पण महाबोधी महाविहारात चिनी बौद्ध भिक्खू व्ह्यूएन त्सांग यांनी पाहिलेली बुद्धाची भव्य मूर्ती तिथे नव्हती. मूळ मूर्ती महंत ब्राह्मणांच्या घराच्या भिंतीत लपवून ठेवल्याची नोंद अहवालात आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेख असलेले दगडही हे ब्राह्मण महंत स्वयंपाकघरात भाजी कापण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शानस आले आहे. आजही, व्ह्यूएन त्सांगने वर्णन केलेले बुद्धाचे दोन डझन स्तूप आणि बौद्ध स्थळे अद्याप सापडलेली नाहीत.
बोधगया येथे सम्राट अशोकाने दक्षिण दिशेला 100 फूट उंच स्तूप बांधला होता. शिओन्ग्नुच्या काळात येथे तीन मजली संघराम दिसला ज्याला महाबोधी संघाराम असे म्हणतात. ज्यामध्ये 600 खोल्या होत्या आणि 1000 भिक्षू राहत होते. कनिंगहॅम नंतर नवीन कोणत्याही सुधारणा करण्यात आल्या नाहीत. महंत ब्राह्मण यांच्यासोबत असलेल्या वादानंतर हा प्रकार घडला असावा. ब्रिटीशांनी भारत सोडल्यानंतर, ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) महंत ब्राह्मणांच्या नियंत्रणाखाली काम करू लागले. महंतांच्या घरात बुद्धाच्या शेकडो मूर्ती, स्तूप आणि शिलालेख पडलेले आहेत. महंत त्यांचा अपमान करत आहेत. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यावर काहीही भाष्य करीत नाही.महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीचे मुख्य प्रवर्तक अनागरीक धम्मपालजी यांनी ही चळवळ सुरू केली. 1893 मध्ये ते महाबोधी महाविहार पाहायला आले. त्याना या महाविहाराची दयनीय अवस्था दिसून आली. महाबोधी महाविहाराला महंत ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. त्यांनी जगातील बौद्ध जगताशी संपर्क साधला आणि अमेरिकेत सर्व धर्म परिषदेचे आयोजन केले, त्यात ते प्रमुख नेते (काशी) म्हणून उदयास आले. परंतु ब्राह्मणांनी तथाकथित स्वातंत्र्याच्या काही दशकांनंतर विवेकानंदांना (कायस्थ व्यक्ती) प्रोत्साहन दिले. अनागरिक धम्मपाल हे परिषदेतून परतताना टोकियो, जपान येथे गेले आणि तेथून त्यांना बोधगया महाविहारमध्ये ठेवण्यासाठी बुद्धाची १८ फुटी मूर्ती देण्यात आली. ब्रिटीश सरकारची परवानगी घेऊन ते महाविहारमध्ये ती मूर्ती ठेवणार होते. परंतु महंत ब्राह्मणाने अनागरिक धम्मपाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करून बुद्धाच्या उपासनेत व्यत्यय आणला.
आयपीसीच्या कलम 295,296,297,143,506 नुसार ब्रिटिश कोर्ट गयामध्ये हा खटला चालवण्यात आला. या ऐतिहासिक प्रकरणात महंत ब्राह्मण त्या महाविहारावरील मालकी हक्क सिद्ध करू शकले नाहीत. या प्रकरणातून अनेक गोष्टी समोर आल्या. बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित करण्याचा ब्राह्मणांचा डाव होता आणि बुद्धाच्या अनुयायांना वैदिक धर्माचे गुलाम बनवण्यासाठी ब्राह्मणांनी बोधगया काबीज केल्याचेही सिद्ध झाले. आणिभारतातील सर्व प्रसिद्ध मंदिरांपैकी बुद्धविहार हे पहिले मंदिर, जे हिंसेद्वारे ब्राह्मणांनी काबीज केले. ब्राह्मण पुराणात ब्राह्मणांनी बुद्धमूर्तीच्या तोंडाकडेही पाहू नये असे लिहिले आहे. बुद्धांचे तोंड पाहणे हे ब्राह्मण सर्वात मोठे पाप मानतात, मग आज त्या महाविहारावर ब्राह्मण का कब्जा करत आहेत? मशिदी, चर्च आणि गुरुद्वारांवर त्या धर्मांचे पालन न करणाऱ्या लोकांचा ताबा नाही. अगदी नुकत्याच झालेल्या राम मंदिर ट्रस्टीमध्ये कोणत्याही अहिन्दू, गैरब्राह्मण लोकांना स्थान नाही. मग बोधगया महाबोधि महाविहाराच्या ट्रस्टीवर ब्राह्मणांचा ताबा का? याचे कारण एकच, ही वास्तू जागतिक वारसा आहे. या ठिकाणी प्रचंड आर्थिक देवाण-घेवाण दानाच्या रूपाने होत असते. इथे येणारे प्रचंड दान हा आर्थिक स्त्रोत इथले ब्राह्मण सोडायला तयार नाहीत.
संपर्क : 9823884567, 8796233881
0 टिप्पण्या