बोधगया येथील महाबोधी महाविहाराला ब्राह्मणी पुजाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांकडे सुपूर्द करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय भिक्खू संघ १२ फेब्रुवारी पासून बोधगया येथे आंदोलन करत आहे. परंतु या आंदोलनाची केंद्रातील मोदी सरकार आणि बिहारमधील नितेशकुमार सरकारच्या जातीवादी लोकांनी अद्याप कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची भावना पसरली असून दोन्ही सरकारने बौद्ध समाजाचा अंत पाहू नये, असे सांगत १२ मे रोजी बौद्ध जयंतीच्या दिनी बोधगया येथे जगभरातून मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहणार असल्याने येथे काहीही होऊ शकते असा इशारा भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो एका पत्रकार परिषदेत दिला.
बुद्धगया मंदिर अधिनियम १९४९ चा कायदा रद्द करावा आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने बुद्धगया येथे १२ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे. लाखो बौद्ध अनुयायी रोज बुद्धगया येथे जाऊन आंदोलन करीत आहेत. परंतु या आंदोलनाची केंद्र सरकार व बिहार सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. भदंत विशुद्धानंदबोधी महाथेरो यांचाही या आंदोलनात मोठा सक्रिय सहभाग आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल याबाबत सविस्तर माहिती दिली.महाबोधी महाविहारच्या ट्रस्टीमध्ये महादलित म्हणून घेतले आहे परंतु ते शासनाचे महंत म्हणून काम करत आहेत. त्यांना बौद्ध धम्माचे कोणतेही ज्ञान नाही, बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी जवळपास दहा खासदारांनी लोकसभेत व राज्यसभेत मागणी केली आहे. परंतु भाजपचे मोदी सरकार त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर मौन धारण केलेले आहे. महाबोधी महाविहाराला देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतो, या निधीवर सरकारचा डोळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी जातात, तेव्हा तेव्हा मी बुद्धांच्या देशातून आलो असे सांगतात. परंतु त्यांना महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असे वाटत नाही. या पत्रकार परिषदेला भदंत संघप्रिय थेरो, भदंत बोधीशील, भदंत बोधिधम्मा, भदंत निर्वाण, उपासिका कांबळे आदी उपस्थित होते.
"देशातील मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारे या त्या त्या धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात आहेत. मात्र महाबोधी महाविहार है बौद्धांचे पचित्र स्थळ असूनही, ते ब्राह्मणी हिंदू ट्रस्टच्या ताब्यात आहे." १९४९ च्या अधिनियमानुसार, महाबोधी मंदिर समितीवर बहुसंख्य हिंदू सदस्यांचा ताबा आहे. केवळ एक महादलित सदस्य ट्रस्टमध्ये घेतलेला असला तरी, त्यांना बौद्ध धम्माचे ज्ञान नाही आणि ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, विदेशातून महाबोधी महाविहारासाठी येणाऱ्या दानाचा गैरवापर केला जात आहे. दवाखाने, शाळा, बौद्ध विहारे उभे राहू शकतात, पण प्रत्यक्षात हे निधी कोणत्याही उपयुक्त कार्यासाठी वापरले जात नाहीत. बिहार सरकार यावर डल्ला मारते. १२ मे रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने जगभरातून बौद्ध उपासक उपासिका बुद्धगया येथे एकत्र येणार आहेत. या दिवशी कायदा हातात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबरी मशिदीसारखी घटना घडू शकते, हे सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे." - भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो
नुकताच प्रदर्शित झालेला जय भीम पँथर हा चित्रपट दलित चळवळीच्या संघटनेवर आधारित आहे. तरच्या दशकामध्ये तरुणांनी एकत्र येत लढाऊ संघटना उभे केले. पूर्वीच्या काळी कोणत्याही वाहनाचे साधन नसताना ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी धावत जाणे, हे या संघटनेचे मुख्य ध्येय होते. हे चित्र या जय भीम चित्रपटांमध्ये दाखविण्यात आले आहे. कोणत्याही आंदोलनाचे यशासाठी कार्यकर्ते मानसिक आणि शारीरिक भावनिक पातळीवर एकजूट असले पाहिजे पराकोटीचे कष्ट करून कार्यकर्त्यांनी हे काम केले आहे. याचा वेध घेणारा जय भीम हा चित्रपट आहे हा चित्रपट सर्वांनी पहावा. हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी ही त्यांनी शासनाकडे केली आहे. त्या संदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केल्याचे भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी केली आहे.
सर मेजर जनरल कनिंगहॅम महाडे यांनी 1890 मध्ये महंतांच्या कोठीमध्ये बुद्धाच्या शेकडो मूर्ती असल्याचे नमूद केले होते. महंत हे बौद्ध धर्माचे कट्टर विरोधक आहेत. महाबोधी महाविहारात त्याच महंत ब्राह्मणाचा कंजा कसा? आम्ही लवकरच विज्ञान प्रवासात याचा खुलासा करणार आहोत. सनातन धम्म लवकरच महंतांच्या घरापर्यंत लाखोंची मिरवणूक काढणार आहे. स्तूपच पाडून शिवलिंग बनवले आहे. महंतांच्या घरातच हा कट पकडला गेला. बौद्धांच्या प्रतिकांची चोरी करून ब्राह्मण धर्म निर्माण झाला. दहशतवादी ब्राह्मणांनी बोधगयावर कब्जा कसा केला? आजही पांडे पुजारी उघडपणे ब्राह्मण धर्माचे कर्मकांड करताना दिसतात. हा बुद्धाचा वारसा आहे हे सर्व जगाला माहीत आहे, तरीही हे ब्राह्मण पंडित येथील पर्यटकांना आणि लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करीत आहेत.
डॉ. विलास खरात यांनी सांगितले की, ऋषीपाल मिश्रा यांचा मुलगा संजय मिश्रा याचा पारंपारिक पद्धतीने महाबोधी महाविहारवर ताबा आहे. संजय मिश्रा हा ब्राह्मण परंपरेनुसार महाबोधी महाविहारच्या मुख्य मंदिरात घंटा वाजवण्याचे काम करतो. तर दुसरा पंड्या बुद्धांच्या पाच मूर्तींना पांडव असल्याचे सांगत आहे. नाचा मुलगा रायण दुबे संजय कुमार दुबे असे त्या पंड्याचे नाव आहे. एका व्हिडिओमध्ये संजय कुमार दुबे बुद्धांना पांडव म्हणत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन समिती अशा लोकांचे पालनपोषण करत आहे आणि त्यांना प्रचंड आर्थिक निधी देत आहे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीचे ब्राह्मण महंत अशा तऱ्हेची सर्व काळे कृत्य करत आहेत. समितीचे अध्यक्ष गया जिल्ह्याचे कलेक्टर असून ते महाबोधी महाविहार येथील ब्राह्मण महंताकडेच हे बुद्धविहार कसे राहिल यासाठी कटही रचत आहेत. ही लढाई जिंकण्यासाठी भारतातील मूळ बहुजनांना जागे व्हावे लागेल आणि ब्राह्मण महंत आणि ब्राह्मण पंडे यांना महाबोधी महाविहारातून हाकलून द्यावे लागेल, तरच महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात येईल, तरच महाबोधी महाविहार वाचेल.
बोधगया येथे असलेले भगवान बुद्धांचे ज्ञानस्थान असलेले महाबोधी महाविहार ब्राह्मण महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी बौद्ध भिक्खूंचे आंदोलन सुरू आहे, मात्र विहार सरकार आणि केंद्र सरकारला बौद्ध भिक्खूंच्या आरोग्याची काळजी नाही. 12 फेब्रुवारीपासून नवीन महाबोधी महाविहार चळवळ सुरू होत आहे. जोपर्यंत ब्राह्मण हा मठ पुजाऱ्यांपासून मुक्त करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार भिक्खुसंघाने केला आहे. याच्या समर्थनार्थ आलेले जगभरातून हजारो लोक महाबोधी महाविहारमध्ये येऊन निषेध करण्यासाठी बसले आहेत. डॉ.विलास खरात म्हणाले की, एकीकडे सरकार आमरण उपोषणाकडे लक्ष देत नाही तर दुसरीकडे महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीच्या ब्राह्मण महंतांना कोणत्याही किंमतीत आंदोलन संपवायचे आहे. यासाठी ब्राह्मण पुजारी आंदोलन स्थळाजवळ रोज काही ना काही कार्यक्रम आयोजित करून आंदोलनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर तो वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहे. आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक आंदोलनस्थळी पोहोचत असून या आंदोलनाला विविध माध्यमातून देशातील करोडो जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
0 टिप्पण्या