Top Post Ad

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जनसुरक्षा विरोधी समितीचे मुंबईत आंदोलन

भाजपा युती सरकार जनसुरक्षा विधेयक आणत असून या विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकपा, भाकपा, शेकाप, सीपीआयएमएल (लिबरेशन), लाल निशाण पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती गठीत केली आहे. या समितीने आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांदे पूर्व येथे आंदोलन करून जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांना निवेदन देण्यात आले.


 शहरी नक्षलवाद्याच्या नावाखाली भाजपा युती सरकार जनसुरक्षा कायदा आणत असून अन्यायाविरोधात आवाज उठवणाच्या जनतेच्या हक्कावर घाला घालण्याचे काम करत आहे.संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी कायदे आहेत त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याची देशाला व महाराष्ट्राला गरच नाही, त्यामुळे हा जुलमी कायदा रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, शिवसेना उबाठाचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष राखी जाधव, कॉ. प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, माजी आमदार अशोक जाधव, काँग्रेस काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, महासचिव अवनीश सिंग, डॉ किशोर सिंग, जयकांत शुक्ला, अनिल शर्मा, क्लाइव्ह डायस, सुभाष भालेराव, नीता महाडिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com