Top Post Ad

नवी मुंबई विमानतळावर विमान उड्डाणाची चाचणी


  भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सिग्नलसह राज्यातील बहूचर्चित नवी  मुंबई विमानतळावर आज बुधवार १७ जुलै रोजी विमान उड्डाणाची चाचणी घेतली.   विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान उडताना आणि उतरताना कोणता अडथळा तर येत नाही ना, हे पाहण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली.  १३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून विमानाचे उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी अचानक नवी  मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घेण्यात आली. यामुळे विकासक कंपनी आणि सिडकोचा विश्वास दुणावला आहे.  भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विशेष विमान नवी मुंबई विमानतळावरून उडणार असल्याचे समजताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे. 

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज सिडकोकडून व्यक्त केला जात आहे. या यशस्वी चाचणीमुळे आता काही महिन्यानंतर या विमानतळावरुन प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांसह रायगडवासियांचे स्वप्न साकार होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com