Top Post Ad

वारी समतेची, मानवतेच्या कल्याणाची...


   फोडा, झोडा आणि राज्य करा, खरंतर ही निती या देशात इंग्रजांनी वापरली असं म्हणतात. हे अर्धसत्य आहे. ही निती इंग्रजांना सांगितली कुणी हे शोधणं आज गरजेचं आहे. या नितीचे उद्गाते कोण असतील तर या देशावर हजारो वर्षापासून राज्य करीत असलेले विदेशी आर्य. याच लोकांनी ही निती समस्त आशियाखंडातील बहुजन वर्गाला असंघटीत करण्यासाठी वापरली. आणि आपली सत्ता अबाधित ठेवली. ती आजही अबाधितच आहे. आजही त्याच नितीने बहुजन वर्गावर हे विदेशी लोक राज्य करत आहेत. अठरापगड जातीत या बहुजन वर्गाला विभागून त्यांनी आपला सत्तेचा अंकुष येथे रोवला तो आजपर्यंत कायम आहे. या अंकुषाला जेव्हा इंग्रजांनी छेद द्यायला सुरुवात केली तेव्हा चले जाव आंदोलनाने जोर धरला. त्याआधी अनेक आंदोलने झाली मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ती आंदोलने मोठी होऊ दिली नाही. इंग्रजांच्या दरबारी कारकूनगिरी करणाऱ्या या मंडळींनी फितुरीने ही आंदोलने दडपली. ही मंडळी कोण होती? त्या काळात बहुजन वर्गाला शिक्षणाची बंदी होती. मग शिक्षित वर्ग कोण तर हा विदेशी आर्य. हाच वर्ग खऱ्या अर्थाने इंग्रजांची चाकरी करीत होता. इथल्या बहुजन वर्गाला कायमस्वरुपी गुलामगिरीत ठेवण्यासाठी इंग्रजांना माहिती पुरवत होता. म्हणूनच आदिवासीं जमातीतून अनेक क्रांतीवीर निर्माण झाले. पण पुढे जाऊन ते समाजाचे नायक बनू नये म्हणून त्यांचे कार्य दडपण्याचे काम बेमालुपणे या लोकांनी केले. मात्र कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आज इतिहास लोकांपुढे येत आहे. हा वेगळा भाग आहे की, त्यातून बहुजन समाज आजही शहाणा होत नाही. अन्यथा  महापुरुषांची अवहेलना करणाऱ्या भीडेप्रवृत्तीला केव्हाचेच ठेचले असते.  

इंग्रजांनी इथल्या बहुजन वर्गाला शिक्षणाचे दारे खुली केली. त्यावेळीच या विदेशी आर्य लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. धार्मिकतेच्या ओझ्याखाली दबलेल्या बहुजन समाजाला या गोष्टी कधीच समजलेल्या नाहीत. किंवा तो समजून घेण्यास असमर्थ ठरला आहे. म्हणूनच इंग्रजांच्या आधी आलेल्या या विदेशी आर्यांची गुलामगिरीविरोधात तो बंड करून उठत नाही. तो नेहमीच आपल्या धार्मिकतेच्या चादरीत स्वत:ला लपेटून घेत राहिला. त्यातच कोटी कोटी देव-देवतांची निर्मिती झाली असली तरी वारकरी संप्रदाय आपल्या विठ्ठलभक्तीत कायमच रमला. याकडे सुरुवातीला विदेशी आर्य लोकांनी कानाडोळा केला खरा. कारण धार्मिक सत्ता  संपूर्णपणे यांच्याच हातात होती. मंदीरातील बडवे हेच लोक होते. मग वारकरी केवळ दुरून दर्शन घेऊन आपआपल्या घरी निघून जायचे. आणि मंदीरातला मलिदा मात्र यांच्या खिशात जायचा. विसाव्या शतकात या मंदिरातील बडवेगिरी बंद झाली तशी याच लोकांनी प्रति विठ्ठल मंदीराची देखील निर्मिती केली आहे. हे विसरून चालणार नाही.  येवढे करूनही वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस अधिकच फूलत चाललेला दिसताच २० शतकाच्या शेवटी शेवटी आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी साई पालखीची टूम काढली. यामध्ये युवकांचा अधिक भरणा असे. या पालखीचं फॅड इतकं वाढलं की, आता प्रति वारकरी संप्रदाय निर्माण होणार असा प्रचारही याच लोकांनी सुरु केला होता. मात्र वेळीच बहुजनांच्या तरुणांना यातली मेख कळली आणि हळू हळू याचं पेव कमी व्हायला लागलं. हा खेळ फसला.

   हजारो वर्षे मानसिक व शारीरिक गुलामगिरी, शिक्षण, व्यवसाय व इतर मानवी स्वांतत्र्यापासुन बहुजनांना दुर ठेऊन अज्ञान, पांखड व अंधश्रद्धेमध्ये ढकलण्याची प्रक्रिया कायम सुरू आहे. प्रत्येक वेळेस नवीन योजना आखल्या जातात. त्या इतक्या बेमालूम असतात की  गुलामी, अंधश्रद्धा, थोतांड, पाखंड याबाबत लोकांना काडीमात्र शंका येत नाही. म्हणूनच या बहुजन समाजात आजही विषमतेची घाण खोलवर रुजली गेली आहे. खरंतर यातून बाहेर येण्यासाठी संत महात्म्यांनी वेळोवेळी उपदेश केला आहे. जो संपूर्ण मानवाचे कल्याण योजतो. मात्र आम्ही त्यांनाही एका समुहात बंदीस्त करून ठेवत आहोत. आज गरज आहे ती समानतेची... आज वारी हवी समतेची, मानवतेच्या कल्याणाची... जो विचार आमच्या संतांनी सातत्याने पेरला इथल्या मातीत रुजवला त्याचा प्रचार आणि प्रसार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com