Top Post Ad

व्यापारी लोकांच्या ताब्यात विमानतळ व बंदरे गेली तर काय होईल

तीन टन हेराईन बेकायदेशीर रित्या अफगाणिस्तान मधून आलेले सापडले. टाल्कम पावडर या नावाखाली आयात केले होते. या खेपेला गलतीसे मिस्टेक हो गया झाले आणि प्रकरण उघडकीस आले. या पूर्वी जूनमध्ये असेच चोविस टन ज्याची मार्केट किंमत सत्तर हजार कोटी आहे अशी टाल्कम पावडर आणलेली आहे.  विजयवाड्याची एक आशा ट्रेडिंग कंपनी म्हणून एक दोन वर्षापूर्वी सुरू केलेली प्रोप्रायटरी फर्म आहे. ती एका महिलेच्या नावाने असून कागदोपत्री पत्ता फक्त आहे. तांदूळ निर्याती साठी लायसन्स घेतले होते. जी चोवीस टनाची कन्साईंमेंट मागवली होती ती दिल्लीकडे एका ट्रक ने रवाना झाली असे रेकॉर्ड सांगते. प्रत्यक्षात 1176 किमी प्रवास करताना या वाहनाने एकही टोलगेट पास केला नाही. याचा अर्थ माल गुजरात मधूनच वितरित झाला... वापरला गेला .कुणाला काय अर्थ काढायचा तो काढावा.  व्यापारी लोकांच्या ताब्यात जर विमानतळ व बंदरे गेली तर काय होईल याची ही झलक आहे.  एखाद्या अभिनेत्याकडे २-४ ग्रॅम्स ड्रग्स सापडल्यावर आकांडतांडव करणारे अंधभक्त आणि गोदी मीडिया गुजरातमध्ये ९ हजार कोटींचे ड्रग्स सापडल्यावरही गप्प का?

 

 हेच का ते प्रसिद्ध गुजरात मॉडेल! 
 सोयाबिनचे भाव पडले . साधारणपणे १० हजार प्रती क्विंटल दर होता सोयाबिनचा. दोन दिवसांपूर्वीच तो ८२०० झाला. काल त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल ५५०० ते ५७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० % दर पडले आहेत. सोयाबिनचे दर पडणारचं होतं. गेल्याच आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केलाय. त्यातच खाद्यतेल आयात शुल्क कमी केलीय. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात केलीय. मग सोयाबीनचे भाव पडले नसते तर नवल ! 

देशातील महत्त्वाचं पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल म्हणून आशा निर्माण झाली असताना सोयाबीनचे भाव पडत आहेत. देशामध्ये जोपर्यंत मोदींच सरकार आहे तो पर्यंत शेतमालाची माती होणारं आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही.  फक्त एकच माहिती सांगतो. देशात तेलबियांच्या व्यवसायात सगळ्यात मोठा ब्रॅंड म्हणजे फाॅर्चुन आहे. हा ब्रॅंड आदानी ग्रुपचा आहे .  हा ग्रुप खाद्यतेलाच्या मार्केटमध्ये शब्दशः दादागिरी करतो. 

देशांतर्गत शेतमालाचे भाव पाडून, पडलेल्या भावात शेतमाल खरेदी करून त्यावर प्रक्रीया उद्योग उभारून, भरमसाठ नफा कमवण्याचे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत.  सध्या सगळ्याच शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या अभिमान्यू सारखी झाली आहे. शेतमाल पिकवण्यासाठी लागणाऱ्या खते, बियाणे, औषधं, औजारे, यंत्र, ते यंत्र चालण्यासाठी लागणारे इंधन (डिझेल) यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र त्याच वेळेस शेतमालाचे भाव मात्र संघटितपणे पाडण्याचं काम केले जात आहे.   टोमॅटोचा लाल चिखल नुकताच सगळ्यांनी पाहिला असेलच. अगदी मिरची, कांदा, भाजीपाला या पिकांचेही माती झालीय.  काही दिवसांपूर्वीच भुईमूगाच्या शेंगाचाही बाजार असाच पडला होता. मात्र शेंगतेलाचं दर मात्र दिवसेंदिवस चढेच होते . 

बाजारपेठेत कृत्रीमरित्या तुटवडा निर्माण करणे किंवा कृत्रिमरित्या पुरवठा वाढवणे ही खेळ मोठे मोठे उद्योजक खेळत असतात.   यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेल्या यंत्रणा अशा उद्योजकांच्या रखेल असतात . कायद्याला पायदळी तुडवत पैसे कमवाण्याचं नवं फॅशन वाढत आहे. यात मात्र मरण होतं ते सर्व सामान्य शेतकऱ्यांचं. शेतकरी पोरांनी नव्या कंपन्या स्थापन करून व्यवसाय करावा म्हटलं तर त्यासाठी लागणारं भांडवलं कुठून उभे करायचं ? हा प्रश्न असतो. 

 बॅंका शेतकऱ्यांना दारातही उभं करत नाहीत.
यावर काही जणांनी स्टींग ॲापरेशन देखील केले होते. बॅंकेतील कर्मचारी शेतकऱ्यांना हाकलून लावतात. कर्जाचा मोबदल्यात पैसे मागतात. एकाने तर थेट शेतकऱ्यांच्या बायकोकडे शरिरसुखाची मागणी केली होती .  तर बॅंका सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत. बॅंकांच्या लेखी शेती आणि शेतकरी दुय्यम आहेत . शेतीसाठी औजारे घेण्यासाठी बॅंका वार्षिक १५% दराने भांडवलं देतात. चैन म्हणून फिरण्यासाठी कार घेत असाल तर त्याला ७% व्याज आकारले जाते. म्हणजे शासनाचा प्राधान्यक्रम समजतो.  सध्या सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतीची माती होण्याची सुरुवात यापुर्वीच झालीय. शेतकरी वैतागून आपली जमीन विकून टाकेल. त्या जमीवर मोठमोठ्या कंपन्या पुन्हा शेतीच करतील फरक येवढाचं की त्या शेतात ज्यांच्या जमिनी गेल्या ते शेतकरी मजूर म्हणून काम करतील. तुमच नव्या भारतात स्वागत आहे.  

या सगळ्या विरोधात तुम्ही बोललात तर देशद्रोही ठरवले जाल. तुमच्यावर खटला दाखल केला जाईल. तुम्हाला शत्रुराष्ट्राचे हस्तक ठरवलं जाईल. अनेक वर्ष तरूंगात खितपत पडून तुमचा तिथेच मृत्यू होईल. यातुन सुटलात तर तुम्हाला सुखाने जगू दिले जाणार नाही. यामुळे बंद झालेली आयपीएल पुन्हा सुरू झालीय. तिचा तुम्ही आनंद घ्या. 
 बाप काय आज ना उद्या मरणार आहेच की !


 जय महाराष्ट्र
 श्रीकांत मयेकर 
 महाराष्ट्र संरक्षण संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com