
मुंब्र्यावरून कमी अंतरावर जाण्याकरिता खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने त्याचा खर्च सर्व सामान्यांना परवडत नाही. यामुळे मुंब्र्यावरून थेट मुंबई व कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी जाण्याकरिता ठाणे परिवहन सेवेची मुंब्र्यावरून बस सेवा सुरु करण्यात यावी याबाबत खा. डॉ. श्रीकांत शिंदे, परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, बालाजी काकडे तसेच महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण प्रयत्नशील होते. अखेर परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी यांनी बस उपलब्ध झाल्याने सदर बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला त्वरित मान्यता दिली असून प्रायोगिक तत्वावर टी.एम.टी.ची वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा २ बस सेवा अक्षय्य तृतीया व रमजान ईद पासून सुरु होणार असल्याची माहिती खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली.
तसेच भिवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वातानुकुलीत बस सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी यांनी यावेळी सांगितले. आता मुंब्र्यामधील रहिवाशांना थेट मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर प्रवास करणे शक्य होणार आहे. अक्षय्य तृतीया व रमजान ईद निमित्त मुंब्रावासियांना अनोखी भेट मिळाल्याने मुंब्रावासियांनी ठाणे परिवहन सेवेचे मनापासून आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या