ठाणे
भारतीयांची अस्मिता जागृत करणारे आंबेडकर सर्व समाजाचे प्रतिंनिधी होते असे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुप्रसिद्ध लेखक आणि अनुवादक अमरनाथ सिंग म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून ते म्हणाले, आंबेडकरांनी दलितांवर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांची अस्मिता जागृत केली आणि त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याबरोबर उभं केलं. पण तरीही त्यांना एका जातीत बंदिस्त करणं बरोबर नाही, ते फक्त दलितांचे नाहीत तर सर्व समाजाचे प्रतींनिधी होते. संविधानात समतेचे, लोकशाहीचे मूल्य असूनही आजही समाजात विषमता नष्ट झाली नाही. जातीव्यवस्थेची जबरदस्त पकड समाजावर आहे. ती नष्ट झाल्याशिवाय सर्वांचा विकास होणे शक्य नाही. हा मूलभूत बादल होण्यासाठी कायद्याने वरुन प्रयत्न होत आले तरीही खालून लोकांकडून त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. या साठीच बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करा हा विचार आज महत्वाचा आहे.
अध्यक्षीय समारोपात जगदिश खैरालिया म्हणाले, बाबासाहेबांनी संविधानात अंगिकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून आज परत पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालला आहे. भांडवलशाही प्रबळ होत चालली आहे. पण याने निराश न होता शेतकरी आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन अशा सर्व अन्याय्य गोष्टींविरुद्ध लढले पाहिजे. सरकारवर वाचक ठेवण्यासाठी अभ्यास, मनन, लेखन करून सत्याग्रही, लोकशाही समाजवादाचा विचार पुढे नेला पाहिजे.
या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, एकलव्य कार्यकर्ते दीपक वाडेकर, प्रवीण खैरालिया यांनी आंबेडकरांच्या विचार आपल्या शब्दात मांडले. एकलव्य कार्यकर्ते आतेश शिंदे आणि ओंकार जंगम यांनी समतेचे गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अजय भोसले यांनी सांभाळली. फेसबूक वर लाईव्ह करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते.
0 टिप्पण्या